माझ्या स्वप्नातील भारत निबंध Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi माझ्या स्वप्नातील भारत … हे गीत ऐकले की आपल्या डोळ्यासमोर आपल्या प्रिय भारत देशाचा तिरंगा वाऱ्याच्या संगे लहरताना दिसतो. जगातील सर्वांत जास्त प्राचीन संस्कृती लाभलेला माझा भारत देश हा शेकडो भाषांनी, परंपरांनी नटलेला आहे. विविध जाती धर्माच, पंथाचे, सांप्रदायाचे लोक आपल्या देशात एकत्रितपणे नांदतात. याशिवाय, आपल्या भारत देशात सर्व जाती – धर्मातील सण, उत्सव, समारंभ मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि जल्लोषाने साजरे केले जातात. अनेक संत, महंत आणि महाराज आपल्या थोर भारत देशात होऊन गेले. त्यांच्या महान विचारांनी आपला भारत देश समृध्द आहे.

“ जहाँ डाल डालपर , सोने की चिडिया करती है बसेरा. वो भारत देश है मेरा , ये भारत देश है मेरा!”

mazya swapnatil bharat essay in marathi

माझ्या स्वप्नातील भारत निबंध – Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

Majhya swapnatil bharat nibandh.

जगामध्ये आपला भारत देश त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे प्रसिध्द आणि नामांकित बनलेला आहे. भारतातील मसाले तर जगप्रसिध्द आहेत. अशा अनेक गोष्टींमध्ये आपला भारत देश सर्वश्रेष्ठ मानला जातो. परंतू, असे असले तरी आपण या प्रसिद्धीमध्ये एवढ्यात समाधान मानले नाही पाहिजे. आपल्या देशाची प्रगती करण्यापासून आपण थांबता कामा नये.

आपले थोर विचारवंत आणि समाजसुधारक आपल्याला सांगून गेलेत की ‘थांबलात तर संपलात’ . त्यामुळे, आपल्याला इतक्या लवकर थांबून चालणार नाही. आपल्याला आपल्या महान भारत देशाला हिमालयाच्या टोकापर्यंत पोहचवण्यासाठी उंच उंच शिखरे पार करावी लागणार आहेत. आपली भारतीय संस्कृती जपून आपल्याला भारत देशाची प्रगती करायची आहे.

पण, त्यासाठी आपल्याला भारताचे एक निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवावे लागणार.

चला तर मग, आज आपण आपल्या स्वप्नातील भारत तयार करूयात! “ भारत माझा देश आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.” अशी प्रतिज्ञा आपण लहानपणापासून शाळेत असताना करत आलो आहोत. या प्रतिज्ञेत आपण भारत आपला देश आहे असे सारे जगाला अभिमानाने सांगतो.

पण, इतके बोलुन फक्त जगाला आपल्या मनातील भारताबद्दलचा अभिमान दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या भारत देशाचा जगातील दर्जा उंचवावा लागेल. त्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आखून दिलेले अष्टप्रधान मंडळ आज कितीतरी दुसऱ्या देशांमध्ये पाळले जाते.

भारत देशाची प्रगती करण्यासाठी सर्वांत पहिल्यांदा आपल्याला हे अष्टप्रधान मंडळ तयार करता आले पाहिजेत. त्यानंतर व्यवस्थित नियोजन करून अष्टप्रधान मंडळ या प्रणालीच्या आदेशाप्रमाणे आपल्याला देशाच्या विकासासाठी काम करणे सोपे जाईल.

माझ्या स्वप्नातील भारत देश हा महम्मद पैगंबर यांच्यासारखा, महाविरांच्या अहिंसेच्या तत्वाचे पालन करणारा; संत नामदेव , संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर यांच्या महान विचारांचा आदर करणारा, कुठल्याही प्रकारचा जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद तसेच लिंगभेद यांवरून आपापसात वाद न करणारा, कोणत्याही दगडधोंड्यांची पूजापाठ करण्यापेक्षा माणसांमध्ये देव पाहून माणुसकी जपणारा, गरजूंना मदत करणारा, मुक्या प्राणिमात्रांवर करुणा, दया आणि सहानुभूती व्यक्त करणारा..

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिकवणुकीच्या तत्वांचा आपल्या आयुष्यामध्ये तंतोतंत पालन करणारा, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्यासारखा आपल्या अपत्यावर उच्च संस्कार करणारा, स्त्री – पुरुष यांच्यामध्ये भेदभाव न करता दोघांनाही त्यांच्या प्रगतीसाठी समान संधी देणारा , स्त्रीभ्रूणहत्या न करणारा, परस्त्रीला मातेसमान मानणारा , शेतकऱ्यांच्या काडीलाही त्यांच्या परवानगीशिवाय हात न लावणारा, इतका आपला भारत देश प्रामाणिक आहे.

माझ्या स्वप्नातील भारत हा राजा हरीचंद्र यांच्या सत्य वचनांवर विश्वास ठेवणारा, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनुसार आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या तत्वांनुसार चालणारा , साने गुरूजी यांच्यासारख्या आज्ञाधारक मुलासारखा, महात्मा गांधींच्या तीन माकडांसारखा म्हणजेच “वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये आणि वाईट पाहू नये” या तत्व प्रणालीचा अवलंब स्वतःच्या आयुष्यात करणारा, दुसऱ्यांना लगेच माफ करून शत्रुत्व कमी करणारा, कोणतीही समस्या आपल्यासमोर येऊन उभी राहिली तरी त्या समस्येला धीटपणे आणि एकत्रितपणे तोंड देणारा आहे.

हिंदू असो अथवा मुसलमान, शिख असो वा ईसाई, मंदिर असो वा मशीद, चर्च असो अथवा गुरुद्वार, अशा सर्व धर्मांचा आणि प्राथनास्थळांचा मनापासून आदर करणारा आहे. असे अनेक थोर विचार जर आपण सर्वांनी आपल्या व्यक्तीमत्वात आणले तर हा स्वप्नातील भारत एक दिवस खरोखर जन्माला येईल हे मात्र खरं!

  • नक्की वाचा: स्वच्छ भारत अभियान निबंध 

मी माझ्या भारताला एका अश्या देशाच्या रूपात पाहू इच्छिते जेथे औद्योगिक आणि तांत्रिक विकास विपुल प्रमाणात असेल. आज भारतातील काही क्षेत्रात विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महिला सशक्तिकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आज जरी मोठ्या प्रमाणात महिला घरातून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करीत असल्या तरी आजही आपल्या समाजात महिलांविरुद्ध मोठ्या प्रमाणात भेदभाव सुरू आहे.

आई – वडिलांकडे असताना,  स्त्रीभ्रूण हत्येपासून ते लग्नानंतर सासरी गेल्यावर देखील स्त्रियांवर होत असलेले घरेलू अत्याचार आपण थांबवणे गरजेचे आहे. अश्या अनेक गोष्टींवर कार्य करणे आवश्यक आहे.

भारतातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण होय. आज जरी भारत सरकार शिक्षण खात्यासाठी जास्त पैसे खर्च करत असला, शिक्षणावर अधिक भर देत असला तरीही म्हणावी तेवढी प्रगती आपल्याला शिक्षण क्षेत्रात दिसत नाही.

आपले भारत सरकार लोकांना शिक्षणाविषयी जागृत करीत आहे तरीही, देशातील काही भाग असे आहेत जेथे अजुनही शिक्षण पोहोचलेले नाही. यासाठी शासनाला आणखी एक पाऊल पुढे टाकून देशातील कोणताही व्यक्ती अशिक्षित राहता कामा नये याची खात्री करून घ्यायला हवी.

याशिवाय शाळा , विद्यालये आणि महाविद्यालये यांच्यामध्ये सध्या सुरू असलेली शिक्षण पद्धत आपण कुठंतरी बदलली पाहिजेत. आजची शिक्षण व्यवस्था आज आपल्याला परीक्षा व्यवस्थेचे रुप धारण करताना दिसत आहे. खरतर, विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे यासाठी शाळा, महाविद्यालये असतात.

पण, आजचे विद्यार्थी फक्त जास्त गुण मिळवण्याच्या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ज्ञान मिळवण्यासाठी खूप कमी मुल ज्ञान मंदिरात जातात, नाहीतर जास्तीत जास्त विद्यार्थी हे फक्त परीक्षा देण्यासाठी या पवित्र ज्ञान मंदिरात जाताना आपल्याला दिसतात.

त्यामुळे, ही शिक्षण पद्धत बदलणं आपल्या देशाच्या विकासासाठी खूप गरजेचं आहे. कारण, विद्यार्थी हे देशाचे भवितव्य ठरवतात. देशाची प्रगती ही विद्यार्थ्यांवर अवलंबून असते.

देशातील तिसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी होय. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित युवा रोजगारापासून वंचित आहेत. त्यांची  योग्यता असतानाही त्यांना योग्य रोजगाराची संधी मिळत नाही. त्यामुळे यासाठी भारत शासनाने देशात उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करायला हव्यात.

माझ्या स्वप्नातील भारतात प्रत्येक नागरिकाला काही न काही काम करण्याची संधी उपलब्ध राहील. आपल्या देशातील चौथी समस्या म्हणजे धर्म, जात-पात इत्यादी गोष्टींवरून होणारे आपापसातील भेदभाव होय. अनेक लोक आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी कट्टरतेचा आधार घेतात.

मी स्वप्न पाहते कि एक दिवस आपला भारत देश हा सर्व प्रकारच्या जातीपातींपासून मुक्त होऊन सशक्त राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करेल. भारतातील पाचवी समस्या म्हणजे भ्रष्टाचार होय. शिक्षणामुळे आज देशातील नागरिक समजदार झाले आहेत, म्हणून देशात पूर्वीपेक्षा भ्रष्टाचार कमी आहे.

परंतु आजही अनेक नेता, राजनेता स्वतःचे खिसे भरण्यात लागलेले आहेत. त्यांना आता यातून जागृत करण्यासाठी आपल्यालाच पावले उचलावी लागणार आहेत.

मी अश्या भारताचे स्वप्न पाहते आहे जेथील सर्व मंत्री पूर्णपणे देशाला समर्पित राहून, भारतातील देशवासीयांच्या विकासासाठी कार्य करतील . माझ्या स्वप्नातील भारत असा असेल जेथे सर्व लोक सुखशांती व प्रेमाने राहतील. आपला भारत अतिप्राचीन व गौरवशाली भारत असेल. आधीच्या काळात भारताला ‘सोन्याची चिमणी ‘ असे म्हटले जायचे.

परंतु, आज वर्तमानकाळात भारतात खूप मोठ्या प्रमाणात दरिद्रता निर्माण झाली आहे. आज आपला भारत देश बऱ्याच जीवनावश्यक गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. मी अश्या भारताची कल्पना करत आहे की जो पूर्णपणे संपन्न असेल. भारत देश फार पूर्वीपासून सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्टीने संपूर्ण जगाचा मार्गदर्शक आहे.

पूर्वीच्या काळी आपल्या देशातील नालंदा व तक्षशिला या विश्वविद्यालयात जगभरातून चीनसारख्या देशातील अनेक विद्यार्थी शिक्षण घ्यायला यायचे. परंतु आज आपल्या देशातील तरुण विदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे, हे कुठंतरी आपण थांबवल पाहिजेत.

माझ्या स्वप्नातील भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनून संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल. आपल्या देशाची संस्कृती पुन्हा एकदा विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून उदयास येईल .

शेवटी मी माझ्या भारत देशासाठी प्रार्थना करते की, “बलसागर भारत होवो , विश्वात शोभुनी राहो ||”

 – तेजल तानाजी पाटील

बागीलगे , चंदगड.

आम्ही दिलेल्या mazya swapnatil bharat essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझ्या स्वप्नातील भारत निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mazya swapnatil bharat essay in marathi language   या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि majhya swapnatil bharat essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण majhya swapnatil bharat nibandh या लेखाचा वापर mazya swapnatil bharat essay in marathi wikipedia असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Mazya Sapnatil Bharat Essay in Marathi

माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी | Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi :- मित्रांनो आज आपण माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

भारत हा एक असा देश आहे जिथे विविध वंश, जाती आणि धर्माचे लोक एकोप्याने राहतात. त्यात समृद्ध, वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा आहे. प्रदीर्घ काळ वसाहतीत राहूनही भारताने स्वातंत्र्यानंतर बराच पल्ला गाठला आहे.

गेल्या काही दशकांमध्ये यात मोठी सामाजिक आणि आर्थिक वाढ झाली आहे. मात्र, जिल्ह्यात आर्थिक आणि सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये लोकांना त्यांच्या जाती आणि धार्मिक आवडीनिवडीमुळे तुच्छतेने पाहिले जाते.

माझ्या स्वप्नांचा भारत एक अशी जागा असेल जिथे प्रत्येक नागरिकाला समानतेचे खरे स्वातंत्र्य मिळेल.आपल्या देशाला पुढे जाण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी अजूनही अनेक क्षेत्रे आहेत ज्यावर काम करणे आवश्यक आहे. शिक्षण हा कोणत्याही राष्ट्राचा पाया असतो. ‘Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi’

Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

आपल्या देशातील एक मोठी कमतरता म्हणजे लोक अजूनही शिक्षणाचे महत्त्व ओळखत नाहीत. दारिद्र्यात किंवा दारिद्र्यरेषेखालील लोक विशेषतः शिक्षित असण्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात.त्यांच्या गरिबीसाठी शिक्षणाचा अभाव हे एक प्रमुख कारण आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.

मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराला चालना देण्याबरोबरच प्रौढ शिक्षणाच्या शाळा उघडून जास्तीत जास्त लोकांना शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सरकार पावले उचलत आहे. माझ्या स्वप्नांचा भारत एक अशी जागा असेल जिथे प्रत्येक नागरिक शिक्षित आणि कुशल असेल.

लैंगिक भेदभाव हा आणखी एक मुद्दा आहे ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. महिला आपल्या हक्कांबाबत जागरुक होत असताना आणि विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करत असतानाही त्यांना समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

देशाच्या अनेक भागांत आजही मुलीचा जन्म हा शाप मानला जातो. मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जात नाही. ज्यांची योग्यता आहे, त्यांनीही बाहेर काम करण्यापेक्षा घरच्यांनी लग्न करणे अपेक्षित आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांना दिले जाणारे वेतन पुरुषांपेक्षा कमी आहे आणि भेदभावाची यादी तयार होते. महिलांवरील भेदभावमुक्त भारताचे मी स्वप्न पाहतो .भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बरीच प्रगती आणि प्रगती पाहिली आहे, तरीही या क्षेत्रात कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

देशातील तेजस्वी मने रोजगाराच्या शोधात परदेशात जातात आणि आपल्या देशाच्या विकासात योगदान देण्याऐवजी त्या देशांच्या तांत्रिक आणि औद्योगिक प्रगतीला हातभार लावतात हे पाहून वाईट वाटते.

पात्र लोकांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आणि देशाच्या पुढील तांत्रिक प्रगतीसाठी सर्वजण मिळून काम करणाऱ्या भारताचे माझे स्वप्न आहे.भारतातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

दररोज बलात्कार, लुटमार, हुंडाबळी, खून अशा अनेक घटना समोर येतात आणि इतर अनेकांच्या लक्षात येत नाही. शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी आणि गरिबी ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. माझ्या स्वप्नांचा भारत हा एक असा देश असेल जिथे सरकार लोकांच्या सुरक्षेबाबत अधिक संवेदनशील असेल.

माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी

हे सर्व प्रकारच्या गुन्हेगारी आणि शोषणापासून मुक्त ठिकाण असेल.भारताने गेल्या काही दशकांमध्ये वेगवान औद्योगिक विकास, तांत्रिक प्रगती आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती पाहिली आहे. मात्र, अजूनही सुधारणेला भरपूर वाव आहे.

भारताला एकेकाळी गोल्डन स्पॅरो म्हटले जायचे कारण तेथील समृद्धी लाभली होती. देशाला ते वैभव परत मिळावे अशी माझी इच्छा आहे. मला ती केवळ आर्थिक समृद्धीच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्याही समृद्ध हवी आहे. ‘Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi’

देशातील सर्व नागरिकांना समान वागणूक मिळाली पाहिजे आणि कोणताही भेदभाव किंवा अन्याय होता कामा नये.माझ्या स्वप्नांचा भारत हा एक असा देश असेल जो आपल्या सर्व नागरिकांना समान वागणूक देईल आणि कोणत्याही निकषांच्या आधारावर भेदभाव करणार नाही.

मला अशा जागेचे स्वप्न आहे जिथे महिलांचा आदर केला जाईल आणि पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळेल. आगामी काळात भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती पाहावी अशी माझी इच्छा आहे. Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

मी भारताचे स्वप्न पाहतो जेथे विविध जाती, पंथ, धर्म, वांशिक गट आणि आर्थिक/सामाजिक स्थितीचे लोक एकमेकांशी परिपूर्ण सुसंवादाने राहतात. ते न्याय्य असले पाहिजे आणि सरकारने आपल्या सर्व नागरिकांना समान रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

Mazya Sapnatil Bharat Essay in Marathi

तर मित्रांना तुम्हाला माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी आवडलाअसेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “Mazya Sapnatil Bharat Essay in Marathi” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

भारत केव्हा स्वतंत्र झाला ?

१५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला.

भारताला एकेकाळी काय म्हटले जायचे आणि का म्हंटले जायचे?

भारताला एकेकाळी गोल्डन स्पॅरो म्हटले जायचे कारण तेथील समृद्धी लाभली होती.

Leave a comment Cancel reply

You must be logged in to post a comment.

My Country Essay in Marathi, Maza Bharat Desh Nibandh, My India देश

  • by Pratiksha More
  • Mar 19, 2024 Mar 19, 2024
  • 22 Comments

maza desh essay in marathi

Maza Bharat Desh Nibandh in Marathi Language

Maza bharat mahan essay : माझा देश निबंध.

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.” अशी प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये सकाळी प्रार्थनेच्या वेळी घेतो. कधी विचार केला आहे का, की हा माझा देश कसा आहे? इतर देशांपेक्षा तो का वेगळा आहे? आणि कुणालाही भारतीय आहे म्हंटल्यावर इतका अभिमान का वाटतो? कारण माझ्या देशात इतकी विविधता आहे जी कुठल्याच देशात नाही!

एका भारतात निसर्ग, प्राणी, मानव, त्यांच्या चालीरीती, दिसणे, भाषा ह्यामध्ये एव्हडी विविधता आहे की जर पूर्ण भारत फिरलो तर सगळे जग बघितल्यासारखे होईल. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपण युरोप, चीन, अफगाणिस्तान आणि साउथ आफ्रिका सगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करतील अशी माणसे आहेत. काश्मीरला युरोप सारखा बर्फ आणि गोरी पान माणसे आहेत, आसाम मणिपुरी ला चिनी लोकांसारखी माणसे आहेत, पंजाब मध्ये अफगाणिस्तानी लोकांसारखी पंजाबी आहेत तर अगदी दक्षिणेला काळी माणसे आहेत. अरब देशासारखे राजस्थानात वाळवंट आहे तर काझीरंगा ला अफ्रिकन सफारी सारखा पार्क आहे. काय नाही आहे माझ्या देशात?

खरोखर अभिमान वाटण्यासारखी, अनादि काळापासून आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. जगातल्या सगळ्या जुन्या संस्कृतींपैकी आपली एक संस्कृती आहे. किती समृद्ध संस्कृती आणि समृद्ध जीवन पद्धती होती आपल्या भारतामध्ये! असे म्हणत की, पूर्वी आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत होता. ह्यात अतिशयोक्ती जरी असली तरी, हे खरे आहे की पूर्वी खरोखर भारतामध्ये अतिशय श्रीमंती होती. इंग्लंड, फ्रांस, पोर्तुगाल, स्पेन अशा देशांतून लोक व्यापारासाठी येत होते आणि थैल्या भरून-भरून संपत्ति घेऊन जात होते.

त्यांचीच वाईट नजर भारताच्या भरभराटीला लागली आणि सुवर्ण काळ ओसरायला लागला. एखाद्या फळांनी लगडलेल्या झाडाला व्रात्य पोरांनी दगड मारून फळे तोडावीत तसे वायव्येच्या खैबर खिंडीतून अफगाणी, हिमालयातून मंगोलियन, दक्षिणेकडून पोर्तुगीज, इंग्रज आणि फ्रेंच ह्या लोकांनी हल्ले करून संपत्ति लुटून न्यायला सुरुवात केली. त्यांच्या यशाचे कारण त्यांचा पराक्रम नसून भारतातली दुही कारणीभूत झाली. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतात १८ पगड जाती जमातीचे, रंग रुपाचे आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. त्या वेळेला त्यांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. राजे विलासी होते आणि आपापसातच लढत होते. ह्या दुहीचा नेमका फायदा ब्रिटीशांनी उचलला आणि आपल्या देशावर तब्बल दिडशे वर्ष राज्य केले. आपली सगळी संपत्ति लुटून इंग्लंडला नेली. राज्ये खालसा केली. हेच काय तर आपला जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात विराजमान झाला. त्यांच्याच काळात देशाचे दोन तुकडे पाडून ‘पाकिस्थान’ जन्माला आला.

जरी ब्रिटीशांनी भारताची संपत्ति लुटून नेली, तरी भारतात जन्माला येणाऱ्या प्रखर देश भक्ती असलेल्या वीरांना ते काही करू शकले नाही. भारत भूमी ही वीरांना, साधू संतांना, महान व प्रचंड बुद्धिमान लोकांना जन्माला घालणारी भूमी आहे. भारताने शून्याचा शोध लावला म्हणून जग आज संख्या मोजत आहेत.

पूर्वीच्या भारतीयांनी इतिहास, भूगोल शास्त्र, खगोलशास्त्र, गणित, विज्ञान, आयुर्वेद अशा सगळ्या शस्त्रांमध्ये इतर देशांपेक्षा खूप प्रगती केली होती. साऱ्या जगातून भारतात शिकण्यासाठी लोक येत होते. तक्षशीला आणि नालंदा, या विद्यापीठांना आजच्या ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड चे महत्व प्राप्त झाले होते. त्याच बुद्धिमत्तेचा वारसा असलेल्या लोकमान्य टिळक, शामाप्रसाद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा प्रखर राष्ट्र भक्ती असलेल्या वीरांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि इतकी वर्षे वेगवेगळे असलेले भारतातील लोक कॉंग्रेसच्या एकाच झेंड्याखाली इंग्रजांशी लढायला एकत्र झाले. तेव्हा आपला देश हा पूर्णपणे खऱ्या अर्थानी अखंड भारत झाला.

सगळ्या जाती धर्माच्या आणि वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या लोकांनी खांद्याला खांदा लावून ब्रिटीशांशी स्वातंत्र्य युद्ध केले आणि शेवटी ब्रिटीशांनी हार मानून आपला देश १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला परत केला. ब्रिटिशांशी दिलेल्या लढ्यानंतर ‘विविधतेत एकता’ ही संकल्पना भारतीय मनात उदयाला आली आणि स्वतंत्र भारतात आपले लोकशाही पद्धतीने राज्य सुरू झाले. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणी मुळे आपल्या देशाचे खूप नुकसान झाले. त्या मुळे सगळ्या देशाने कंबर कसून हयातून बाहेर पडायचा संकल्प केला, आणि भारताला पूर्वीचे सुवर्ण युग प्राप्त करून देण्याचा निश्चय केला.

विद्वानांची भारतात खाणच आहे; त्या मुळे आपण आता अवकाशयान सोडण्या इतपत प्रगती करू शकलो. डॉक्टर अब्दुल कलाम हे त्यापैकीच एक. त्यांच्यामुळे आपण आता अमेरिकेच्या तोडीस तोड खगोलशास्त्रात प्रगती करू शकतो. पुरेसे आधुनिक सैन्य बळ आणि शस्त्र बळ नसेल तर कुठलाही देश तग धरू शकणार नाही हे ओळखून द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी सैन्य बळ आणि शस्त्र बळ वाढवून कुठल्याही आक्रमणाला तोंड देण्या इतपत भारताची प्रगती केली आहे.

उद्योगांमध्ये सुद्धा टाटा, जिंदाल, अंबानी ह्या सारख्या लोकांनी भारताचे स्थान उंचावर नेऊन ठेवले आहे. ‘जय जवान जय किसान’ हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य आहे; त्या मुळे शेती उद्योगातही नव नवीन शोध लावून प्रचंड प्रगती झाली आहे.

भारतात सगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत, पण एकी मात्र अजून दूरच आहे. अजूनही देशामध्ये जाती-धर्मावरून दंगे धोपे चालू आहेत. उत्तरेकडे चीन आणि पाकिस्तान यांच्या एकत्र आक्रमणाची भीती आहे. नक्षलवाद आणि दहशतवादाने देश अजूनही पोखरला गेला आहे. त्या मुळे प्रगतीला खीळ बसत आहे. प्रांतीयवाद सुद्धा जोर धरू लागलेला आहे. ह्या दुहीचा आपण एकदा कटू अनुभव घेतला असून सुद्धा आपल्यामध्ये फरक पडत नाही. सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे गरिबी व बेकारीचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी पण वाढली आहे.

ह्या सर्व संकटांवर मात करून भारत अजूनही प्रगतीच्या दिशेने जात आहे. नक्कीच भारताचे सुवर्ण युग पुन्हा येण्याची आशा निर्माण झाली आहे.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Majha Bharat Desh Mahan, My Country India Essay Composition

Related posts, 22 thoughts on “my country essay in marathi, maza bharat desh nibandh, my india देश”.

thanks for essay! excellent use of words.

superb eassy

maaza pragat bharat nibandh pathva

Very very very very very good essay

हा निबंध मी माझ्या शुद्धलेखनाच्या पुस्तकांमध्ये राईत केला हा निबंध मला खूप आवडला.

“Me Bharat desh bolato ahe” ya vishayacha nibandh pathva

Very nice eassy

It’s really phenomenal…it helped me a lot…thank you lovely essay

its a superb essay it helped me a lot thank you so much keep it up…

Yes, it is good it helps me

A very good essay

Excellent essay…Have not read better than this

Great information you are doing great work keep it up

Very good thank you

Very good essay

A good essay

Very very nice

Thanks for essy

Thank you very much for the lovely essay

Thank you for essay

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती
  • अनुक्रमणिका
  • माहिती

माझा भारत महान ! (वर्णनात्मक निबंध) | Maza bharat mahan nibadh

माझा भारत महान .

        

          भारत माझी मातृभूमी आहे . याच मातृभूमीने माझे पालन-पोषण केले आहे. यामुळे माझा भारत देश माझ्यासाठी माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे.

          माझा भारत देश जगातील सर्वात मोठे  लोकशाही राष्ट्र  आहे . भारताचा इतिहास मोठा स्फुर्तिदायक  अस ल्याचा आपल्याला पाहावयास मिळतो. भारतीय प्राचीन संस्कृती हि आमच्या गौरवशाली भारताची वर्षानुवर्षे जपलेली अनमोल ठेव आहे. या भारताच्या प्राचीन संस्कृतीला हजारो वर्षांची तेजस्वी परंपरा लाभली आहे. भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा हे भारताचे वैशिट्य आहे. या सर्व भाषा आपापल्या साहित्याने समृद्ध असल्याचे आपल्याला पहावयास मिळते. हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा आहे तर 'सत्यमेव जायते'! हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. 'विश्वविजयी तिरंगा' हा आमच्या वैभवशाली भारताचा राष्ट्रधवज आहे. 'जन-गण-मन' हे आमचे प्रियतम राष्ट्रगीत आहे. आमची अस्मिता असणारे 'अशोकचक्र' हे साऱ्या जगाला शांतीचा संदेश देते. विविध धर्मांचे , पंथाचे आणि जातींचे कोट्यवधी लोक या देशामध्ये गुण्यागोविंदाने राहतात. विविध , प्रांत, धर्म, जाती यांच्या रितीरिवाजांतही भिन्नता आहे ; पण या विविधतेतही एकता असल्याची दिसून येते कारण आम्ही सर्वजण भारतीय आहोत.

          विविधतेने नटलेल्या भारताचा भूगोल देखील वैविध्यपूर्ण आहे. मोसमी वाऱ्यांचे   वरदान ,  पर्वताचा राजा हिमालय उत्तर दिशेला मुकुटाप्रमाणे देशाची शोभा वाढवतो. याच हिमालयाची मायेची पाखर आणि गंगा यमुना कृष्ण आणि गोदावरी यांसारख्या अनेक नद्यांची माया ममता यांवर माझी मातृभूमी पोसलेली आहे. या नद्या जणू काही माझ्या मातृभूमीच्या गळ्यातल्या हाराप्रमाणे माझ्या देशाचे सौदर्य वाढवतात. आणि आमचे सुंदर काश्मीर आमच्या देशाचा स्वर्गच आहे. भारत देशावर निसर्गाचा तर वरदहस्तच आहे. नैसर्गिक सौदर्यांची एवढी विविधता जगात अन्य कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळत नाही. जगाला आचार , विचार , व्यापार-व्यवहार आणि ज्ञान विज्ञानाची शिकवण  भारताकडूनच मिळाली आहे. संयम, त्याग, अहिंसा आणि विश्वबंधुत्व हे भारतीय जीवनाचे आदर्श आहेत. सभ्यतेचा सूर्योदय सर्वात आधी याच देशामध्ये झाला होता. विविध कला याच देशामध्ये उदयास आल्या आणि विकसित  झाल्या  कृषि-विज्ञान, औषधींविज्ञान यांचा देशामध्ये चांगल्याप्रकारे विकास झाला. अजिंठा, एलोरा च्या गुहा दक्षिण भारतामध्ये स्थित असलेली मंदिरे, आग्र्याला असणारा ताजमहाल असो व दिल्ली चा कुतुबमीनार यांसारखे कलेचे उत्तम नमुने या माझ्या प्राणप्रिय देशामध्ये आपल्यलाला पाहावयास मिळतात. हजारो-लाखो पर्यटक याना भेटी देसण्यासाठी  दरवर्षी भारतामध्ये येत असतात.

          माझ्या भारतमातेने  अनेक नररत्नांना जन्म दिला आहे. सम्राट अशोकाचे शांतिपर्व , गौतम बद्धांचा त्याग , शिवाजी महाराजांची स्वराज्याची प्रेरणा ही सर्व आमची स्फुर्तिस्थाने आहेत. दया, क्षमा, शांती यांची शिकवण देणाऱ्या संतांचा आमच्या देशाला वारसा लाभला आहे. स्वातंत्रवीर सावरकर असोत व या भगतसिंग यांसारख्या क्रांतिवीरांची तेजस्वी परंपरा माझ्या देशाला लाभली आहे. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारखे दलितांचे कैवारी. लोकमान्य टिळक , सुभाषचंद्र बोस यांसारखे नेते गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर ,  सरोजिनी नायडू यांसारखे प्रतिभावान ; स्वामी विवेकानंद, गाडगेबाबा यांसारखे विचारवंत संत या सर्व महान विभूतींनी गौरवस्पद ठरलेला माझा भारत हा महानच आहे.

          माझ्या या भारत देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली. अनेक संकटे आली मग ती मानवनिर्मित असूदेत किंवा नैसर्गिक संकटे असोत. प्रत्येक संकटांचा सामना आम्ही भारतीयांनी एकत्र मिळून केला आहे . आधुनिक जमध्ये सुद्धा भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे.   शेती उद्योगधंदे व्यापार विविध सेवाक्षेत्र तसेच शिक्षण असो वा संशोधन अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये उच्च स्थान मिळून भारत हा स्वयंपूर्ण बनला आहेच ; शिवाय जगातील जे कमजोर देश आहात त्यांना आधार देण्याची क्षमताही आज   भारताने प्राप्त केली आहे. एक उगवती महासत्ता म्हणून जग आज भारताकडे पाहत आहे. म्हणूनच तर सर्व जागतिक प्रश्नांच्या वेळी जगाला भारताचे मत लक्षात घ्यावे लागतेच त्यामुळे जगाच्या पाठीवर कोठेही वावरणाऱ्या भारतीयांच्या मनात एकाच मंत्र गुंजत असतो , तो म्हणजे भारत माझा जगी महान !

मित्रांनो निबंध लिहिताना या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.👇

[मुद्दे -        .

प्रस्तावना

जगातले सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र 

भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता

अनेक थोर पुरुषांचा, संतांचा येथे जन्म झाला.

संकटाच्या वेळी भारतीय एकजुटीने सामना करतात.

आधुनिक जगात भारताची प्रगती

तंत्रज्ञान, व्यापार विविध क्षेत्रामध्ये भारताचे स्थान अव्व्ल

भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर ]

हा निबंध खालील प्रकारे शोधू शकता.  

My country essay    in Marathi Bharat maza desh aahe yavar nibandh Bhrat desh nibandh Bharat desh mahan nibandh Essay in mrathi maza desh Nivandh in Marathi maza desh माझा देश निबंध मराठी माझा देश निबंध

निबंध pdf file :.

  • निबंध आवडल्यास आम्हाला  COMMENT  करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला  COMMENT  मध्ये किंवा  CONTACT FORM  द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • माझा भारत महान ! आपला  भारत  देश कसा महान  आहे , तुम्ही केलेल्या वर्णनातून तुमचे  तुमचे मत आम्हाला नक्की   COMMENT  द्वारे कळवा.

धन्यवाद.  

India in my Dream Essay | Mazya Swapnatil Bharat Nibandh | माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी

माझ्या स्वप्नातील भारत निबंध.

essay in marathi maza bharat

भारत हा एक वैविध्यपूर्ण देश आहे, जो त्याच्या समृद्ध संस्कृती, वारसा आणि इतिहासासाठी ओळखला जातो. एक भारतीय नागरिक म्हणून, माझे माझ्या देशाचे स्वप्न आहे ज्यामध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या निबंधात, मी माझ्या स्वप्नातील भारतासाठीचे माझे व्हिजन आणि ते कसे साध्य करता येईल ते सांगेन.

निबंधाच्या विषयाची थोडक्यात ओळख करून द्या भारताच्या विविधतेची आणि संस्कृतीची पार्श्वभूमी द्या भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, ज्यामध्ये विविध धर्म, भाषा आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. एक विकसनशील देश असूनही, भारताने गेल्या काही दशकांमध्ये विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. मात्र, विकसित आणि समृद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

भारतातील शिक्षणाच्या महत्त्वाची चर्चा करा भारतातील शिक्षणाच्या सद्यस्थितीचे वर्णन करा भारतातील शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात शिक्षण हा कोणत्याही विकसित समाजाचा पाया असतो. तथापि, भारतामध्ये, शिक्षण प्रणालीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्यात पायाभूत सुविधांचा अभाव, अध्यापनाचा दर्जा कमी असणे आणि ग्रामीण भागातील शिक्षणापर्यंत मर्यादित प्रवेश यांचा समावेश आहे. माझे भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, सर्वांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी काहीही असो, त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे

आरोग्य सेवा

भारतातील आरोग्यसेवेच्या महत्त्वाची चर्चा करा भारतातील आरोग्यसेवेच्या सद्यस्थितीचे वर्णन करा भारतातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. भारतात, तथापि, आरोग्य सेवा प्रणाली अपुरी पायाभूत सुविधा, वैद्यकीय व्यावसायिकांचा तुटवडा आणि उच्च खिशातील खर्च यांसह अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. भारतासाठी माझे स्वप्न साकार करण्यासाठी, सर्वांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यावर लक्ष केंद्रित करून आरोग्य सेवा प्रणालीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

अर्थव्यवस्था

भारतातील मजबूत अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाची चर्चा करा भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीचे वर्णन करा भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात कोणत्याही देशाच्या विकासासाठी मजबूत आणि स्थिर अर्थव्यवस्था आवश्यक असते. भारतामध्ये, अलिकडच्या वर्षांत अर्थव्यवस्था स्थिरपणे वाढत आहे, परंतु अजूनही अनेक आव्हाने आहेत ज्यात बेरोजगारी, गरिबी आणि असमानता यांचा समावेश आहे. माझे भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकारने अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गरिबी कमी करणे आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करणे यावर भर देणे आवश्यक आहे.

भारतातील पर्यावरणाच्या संरक्षणाच्या महत्त्वाची चर्चा करा भारतातील पर्यावरणाच्या सद्यस्थितीचे वर्णन करा भारतातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात कोणत्याही देशाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे असते. भारतात मात्र, प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदल यांसह विविध स्त्रोतांकडून पर्यावरणाला धोका आहे. माझे भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, आपण शाश्वत पद्धतींचा अवलंब करणे, अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देणे आणि आपल्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

मजबूत शिक्षण व्यवस्था, परवडणारी आरोग्यसेवा, भरभराटीची अर्थव्यवस्था आणि शाश्वत वातावरण असलेला एक विकसित आणि समृद्ध देश म्हणून भारताकडे पाहण्याचे माझे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार, नागरिक आणि इतर भागधारकांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. चला एका चांगल्या भारताच्या दिशेने काम करूया, जिथे प्रत्येक नागरिकाला त्यांची पूर्ण क्षमता ओळखता येईल.

चांगल्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी व्यक्ती काय योगदान देऊ शकतात? शाश्वत पद्धतींचा अवलंब करून, सामाजिक न्यायाला चालना देऊन, लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आणि सामाजिक कारणांसाठी स्वयंसेवा करून व्यक्ती चांगल्या भारताच्या स्वप्नात योगदान देऊ शकतात.

उत्तम भारताचे स्वप्न साकार करण्यात शिक्षणाची भूमिका काय आहे? उत्तम भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. हे गरिबी कमी करण्यास, आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी आणि अधिक माहितीपूर्ण आणि व्यस्त नागरिक तयार करण्यात मदत करू शकते.

भारतातील उत्पन्न असमानता दूर करण्यासाठी काय करता येईल? उत्पन्नातील असमानता दूर करण्यासाठी सरकारने रोजगाराच्या संधी निर्माण करणे, उद्योजकतेला चालना देणे आणि प्रभावी समाजकल्याण कार्यक्रम राबवणे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

भारतातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काय करता येईल? भारतातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, आपण अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा अवलंब करणे, शाश्वत शेती आणि वनीकरण पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि आपल्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

भारत तांत्रिकदृष्ट्या प्रगत देश कसा बनू शकतो? शिक्षण आणि कौशल्य विकासात गुंतवणूक करून, नवकल्पना आणि संशोधनाला चालना देऊन आणि डिजिटल परिवर्तन स्वीकारून भारत एक तांत्रिकदृष्ट्या प्रगत देश बनू शकतो.

शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक भारत: हे स्वप्न साकार करण्यासाठी जातीय सलोखा वाढवणे आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. हे आंतरधर्मीय संवादांना चालना देऊन, न्यायासाठी समान प्रवेश सुनिश्चित करून आणि सामाजिक असमानता दूर करून केले जाऊ शकते. भारत हा असा देश असावा जिथे प्रत्येकाला त्यांची जात, पंथ किंवा धर्म काहीही असो, सुरक्षित आणि संरक्षित वाटेल.

समृद्ध भारत: भारताने आर्थिक विकासाला चालना देणे, उद्योजकतेला चालना देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देणे आवश्यक आहे. हे लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना प्रोत्साहन देऊन, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून आणि व्यवसायासाठी अनुकूल धोरणे राबवून केले जाऊ शकते.

शाश्वत भारत: हे स्वप्न साकार करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यामध्ये अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा अवलंब करणे, शाश्वत शेती आणि वनीकरण पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि आमच्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे समाविष्ट आहे.

तांत्रिकदृष्ट्या प्रगत भारत: भारतामध्ये नावीन्य आणि संशोधनात अग्रेसर बनण्याची क्षमता आहे. हे स्वप्न साध्य करण्यासाठी, शिक्षण आणि कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक करणे, डिजिटल परिवर्तनास प्रोत्साहन देणे आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे.

सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भारत: भारताला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे आणि आपण ते जतन करणे आवश्यक आहे. यामध्ये पर्यटनाला चालना देणे, सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे आणि आपला वारसा आणि परंपरा जतन करणे समाविष्ट आहे.

शेवटी, भारत हे अमर्याद क्षमता असलेले महान राष्ट्र आहे. एका चांगल्या भारताचे माझे स्वप्न साकार करण्यासाठी, शांतता, समृद्धी, शाश्वतता, तांत्रिक प्रगती आणि सांस्कृतिक समृद्धी यांना चालना देण्यासाठी आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे. एकत्र काम करूनच आपण भारत आणि तेथील नागरिकांसाठी उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • Maza Desh Bharat Essay | Maza Desh Bharat Nibandh | माझा देश भारत मराठी निबंध
  • Maza Maharashtra Essay | Maza Maharashtra Nibandh |माझा महाराष्ट्र निबंध मराठी.
  • Paryavaran Samvardhan Essay | Paryavaran Samvardhan Nibandh | पर्यावरण संवर्धन काळाची गरज…
  • Population Growth Essay | Population Information Nibandh | लोकसंख्या वाढ निबंध मराठी.
  • If I become the Prime Minister Essay | Me pantpradhan zalo tar Nibandh | जर मी पंतप्रधान…
  • Plastic Mukt Bharat Essay | Plastic Mukt Bharat Nibandh | प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

माझा भारत देश महान निबंध मराठी | Maza Bharat Desh Mahan Nibandh In Marathi

माझा भारत देश महान निबंध मराठी | Maza Bharat Desh Mahan Nibandh In Marathi

भारतीय नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. मी ज्या देशांमध्ये राहतो त्या देशाचे नाव भारत देश असे आहे. माझा देश आहे मला खूप आवडतो. त्यामुळे माझ्या मते माझा भारत देश महान आहे. माझा भारत देश जगातील सर्व देश आणि पैकी सर्वात मोठे लोकशाही राज्य आहे.

माझ्या भारत देशाचा इतिहास हा खूप मोठा प्राचीन आणि सांस्कृतिक वारसा चे नेम जोपासलेला आहे. प्राचीन भारतीय संस्कृति ही माझ्या भारत देशाला लाभलेली सर्वात मोठी देणगी आहे. हजारो तेजस्वी परंपरा माझ्या भारताला लाभली आहे.

भारतात राहणारे विविध जातीचे धर्माचे लोक आणि भारताच्या प्रत्येक राज्याची विशेष अशी बोलली जाणारी भाषा हे माझ्या भारत देशाचे वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा साहित्य आणि समृद्ध आहेत.

हिंदी भाषा ही माझ्या भारत देशाची राष्ट्रभाषा आहे तर सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. जनगणमन हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. विश्वविजयी असा तिरंगा माझ्या भारताचा राष्ट्रध्वज आहे.

संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे अशोकचक्र ही भारताची अस्मिता आहे. रुपया हे भारताचे चलन आहे. कमळ हे माझ्या भारताचे राष्ट्रीय फूल आहे तर वाघ हा माझ्या भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.

135 करोड लोकसंख्या असलेला लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा माझा भारत देशामध्ये विविध जातीचे, पंथाचे आणि धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विविधत जाती-धर्म याचा रितीरिवाज आणि सांस्कृतिक आविष्कार अशी भिन्नता लाभलेली आहे. या मुळेच माझ्या भारत देशाला विविधता मध्ये एकता असणारा देश म्हणून देखील ओळखले जाते.

भारत देशाच्या प्रमाणे विविध जाती धर्माचे लोक लाभले आहेत त्याप्रमाणे ऋतूनुसार बदलणारे वातावरण देखील लाभले आहे. मोसमी वाऱ्यांची वरदान, गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी अशा पवित्र नद्या, हिमालय सारखा पर्वत, काश्मीर- महाबळेश्वर सारखी निसर्गाची सुंदर देण तिचा धार्मिक ठिकाणे यांसारख्या पवित्र अशा मातृभूमेने माझ्या भारत देशाला आणखीनच महान बनवले आहे.

दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या राजवटीखाली गुलाम करणारा माझा भारत देश आज जगामधील विकसनशील देशाच्या यादीमध्ये सामाविष्ट झाला आहे. जसा काळ बदलत गेला तसा माझा भारत देशाचे रूप देखील बदलत गेले.

माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी कित्येक महान क्रांतिकारी आणि पुरुषाने आपल्या प्राणांची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या बलिदानाच्या रक्ताने माझ्या भारत देशाला महान बनविले आहे.

स्वतः च्या प्राणाचा त्याग करून माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक महान धडपडले अखेर माझ्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. माझा भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी माझा भारत देश प्रजासत्ताक झाला व माझा भारत देशात संविधान लागू झाले.

तसेच माझ्या भारत भूमी मध्ये अनेक रत्नांनी जन्म घेतला. सम्राट अशोक, गौतम बुद्ध, महावीर अशा अनेक रत्नांनी माझा भारत भूमीला पावन केले. दया, क्षमा, शांतता, समाज प्रबोधन घडवणाऱ्या संतांचा वारसा माझ्या भारत देशाला लाभला. अशा या माझ्या पावन आणि विविधतेने नटलेल्या भारतावर जेव्हा परराष्ट्रीय देशाने आक्रमण केले तेव्हा माझ्या भारतातील सर्व जनता त्यांना तोंड देण्यासाठी एकत्रितपणे उभा राहिले.

आजच्या आधुनिक  भारताने तर सर्व क्षेत्रांमध्ये आपली कामगिरी दाखवली आहेत खेळापासून ते चित्रपट सृष्टी पर्यंत माझा भारत देश  अव्वल दर्जावर आहे. माझ्या भारत देशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे माझा भारत देश कृषिप्रधान देश आहे. माझा भारत देशातील बहुतांश जनता हे शेतीवर अवलंबून आहे.

स्वतः च्या कर्तब बाजीवर माझ्या भारत देशातील लोकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावली आहे. आज माझ्या भारत देशामध्ये विविध उद्योगधंदे कंपन्या व्यवसायात अस्तित्वाला आले आहेत.

एवढेच नसून सेवा आणि शिक्षण क्षेत्राने तर माझा भारतामध्ये खूप प्रगती केलेली आहे. आज माझ्या भारत देशामध्ये डिजिटल स्वरूपाचे शिक्षण दिले जाते जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळावे व तरुण पिढीने देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी नवीन कार्य करून दाखवावे.

अलीकडच्या काही वर्षांपासून माझ्या भारत देशाला स्वच्छ भारत व सुंदर भारत करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच माझ्या भारत देशातील प्रत्येक जनता आत्मनिर्भर आणि स्वावलंबी कसे बनते याकडे लक्ष केंद्रित केले जात आहे.

जगातील अनेक कमजोर देशांना  क्षमता मिळवून देण्यासाठी माझा भारत देश कार्यरत आहे. एक उगवती महासत्ता  म्हणून संपूर्ण जग माझ्या भारताकडे पाहत आहे. म्हणून तर जागतिक प्रश्नाच्या वेळी जगाला भारत देशाचे मत जाणून घ्यावे लागत आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर वावरणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकच मंत्र घुमत आहे ते म्हणजे माझा भारत महान!

तर मित्रांनो ! ” माझा भारत देश महान निबंध मराठी | Maza Bharat Desh Mahan Nibandh In Marathi “   वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • वृक्ष आपले मित्र मराठी निबंध
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी
  • मराठी बाराखडी इंग्रजीत
  • माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी
  • माझा आवडता सण होळी निबंध

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

NibandhMarathiBhashan.ninja - निबंध, भाषणे, चरित्रे, माहिती

माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी | mazya swapnatil bharat essay in marathi.

मराठी भाषेत सारांशात, 'माझा स्वप्न, माझा भारत' हे एक अद्भुत विचार आहे.

हे एक सर्व सुरक्षित आणि संपन्न देश कसा असावा, हे माझ्या हृदयातलं एक अद्भुत कल्पना आहे.

आपलं भारत, आपलं स्वप्न, हे एकमेकांचं सुरंगतंत्र आहे, असं मला वाटतं.

या निबंधात, 'माझ्या स्वप्नातील भारत', मला माझं आकांक्षांसंबंधित भारत कसं दिसतंय आहे हे सांगणारं आहे.

या भारताचं स्वरूप आणि आत्मविकास, यामध्ये स्थानिक सांस्कृतिक भंडार आणि समृद्धीसाठी माझं सुदृढ आणि अनिवार्य विचारधारा आहे.

आपलं भविष्य कसं दिसतंय आहे हे त्यामुळं, एक मराठी निबंधात या अनिवार्य विचारांचं संग्रहण केलं गेलं आहे.

या निबंधाचं अद्भुत सफरात, आपलं भारत कसं विकसतंय, त्यातील मुद्दे, आपलं सांस्कृतिक धरोहर, आणि भविष्यचं निरूपाधिक आकांक्षांसंबंधित सर्व काही विचारलं जाईल.

त्यामुळं, या निबंधात 'माझ्या स्वप्नातील भारत' म्हणजेच एक अद्भुत आणि सोचवलेलं अनुभव सांगतलं जाईल.

आचार्य विश्वनाथ काणेकर म्हणजे, "स्वप्न हे असंतुष्टीचं मूल आहे." आपलं भारतसंबंधीत स्वप्न असंतुष्ट आहे का? तर आपलं हरकत ठरवायचं आहे, कारण आपलं हरकतेचं प्रतिसाद, आपलं भारतसंबंधीत स्वप्न, आपल्या स्वप्नातील भारतला आगे नेतंय.

ह्या सफरात आपलं साथ देणारं आणि आपलं भारत सुधारणारं ह्या निबंधाचं म्हणजेच प्रारंभ.

त्यामुळं, सजग रहा, जगा त्यांचं बदल, आणि हे निबंध तुमचं आपलं भारत आणि त्याचं सफर सुंदर आणि अद्भुत कसं दिसतंय, त्यातील सर्वांगी सांगण्याचं प्रयास करणारं आहे.

माझ्या स्वप्नातील भारत: एक स्वप्न, एक अभियांत्रण

परिचय.

"स्वप्न हे असंतुष्टीचं मूल आहे," हे आचार्य विश्वनाथ काणेकर यांचं अद्भुत निर्देशन आहे.

माझ्या स्वप्नातील भारत, एक स्वप्नाचं पुनर्निर्माण करणारं अभियांत्रण आहे.

ह्या निबंधात, हमी स्वप्न, भारताचं अनुपम दर्शन, आणि अद्भुत सर्वभूत भारतीय सांस्कृतिक धरोहर सुचलंकृत करणारं आहे.

भारताचं विचार

स्वप्नातील समृद्धीसंबंधित दृष्टिकोण

भारत म्हणजे एक समृद्ध, आर्थिक आणि सांस्कृतिक विकसित राष्ट्र.

ह्या स्वप्नातील भारताचं एक महत्त्वाचं सिद्धांत आहे - समृद्धीसाठी संघर्ष करणं आणि सर्वांगी समृद्धीसंबंधित विकास करणं.

अशी दृष्टीकोनाने आपलं भारत एक विकसित, समृद्ध आणि उजवणारं आदर्श राष्ट्र असलं पहिलं प्रधान ध्यासात आलंय.

आत्मनिर्भरता आणि स्वदेशी आंदोलन

महात्मा गांधींचं स्वदेशी आंदोलन आणि आत्मनिर्भरता सिद्धांत यात्रेत अपूर्व महत्त्व देतात.

"स्वदेशी हे माझं प्रेरणा स्त्रोत आहे," हे गांधीजींचं म्हणजेच आहे.

आत्मनिर्भर भारत हे एक स्वप्नाचं पूर्ण होणारं आणि आपलं भारत आपल्या स्वतंत्रतेचं आत्मविश्वास साकारणारं असलं प्रमाणिक.

भारताचं धरोहर

संस्कृती, कला आणि साहित्य

भारताचं सांस्कृतिक धरोहर, त्याचं अद्भुत सौंदर्य, विचारशीलता आणि कला हे विश्वातील सर्व भूमिकांतर छान ओळखलंय.

संस्कृतीतलं संपूर्णता, भारताचं गौरव आणि एकत्रतेचं प्रतीक आहे.

काळजीप्रमाणे इतिहासातील बाहेरील्या कोणत्याही क्षणांतरांत, भारताचं सांस्कृतिक धरोहर चंद्रगुप्त व मौर्य राजांपासून लेकर, सत्यशोधक सावित्रीबाई फुले आणि डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींपर्यंत विस्तृत आहे.

भारतीय सजीवशास्त्र

आपलं भारत म्हणजे योगी, ऋषि आणि सांत.

भारताचं सजीवशास्त्र योग, आयुर्वेद, ध्यान, आणि तात्कालिक आहे.

"स्वास्थ्य मुद्रा हा योगाचं एक अद्भुत भाग आहे," हे स्वामी विवेकानंद यांचं म्हणजेच आहे.

भारताचं योग, आणि आयुर्वेद या अद्वितीय संबंधाने हमारं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य सुरक्षित करण्यात मदत करतात.

भविष्यचं निरूपाधिक आकांक्षांसंबंधित

शिक्षण आणि विज्ञान

भारत म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, आणि अनुसंधानात्मक अभियांत्रणाचं आकांक्षी राष्ट्र.

आपलं भारत समृद्धीसाठी व अभियांत्रणासाठी शिक्षण आणि विज्ञानात्मक स्फुरणारं असलं प्रमाणिक.

"ज्ञान म्हणजे शक्ती," हे जवाहरलाल नेहरूंचं म्हणजेच आहे, आणि आपलं भारत या शक्तीत प्रमुख स्थानावर स्थापित होऊ शकतं.

नागरिकांचं योगदान

सामाजिक सांघटन आणि सेवाभाव

माझ्या स्वप्नातील भारताचं रूपांतर सामाजिक सांघटनाच्या मूळांतर असणं आणि सेवेचं मूल्य योग्य आहे.

स्वामी विवेकानंद यांनी म्हणजेच, "सेवा म्हणजे भगवानाचं पूजन." आपलं भारत, समृद्ध, सातत्यपूर्ण सामाजिक सांघटनाने सुचलंकृत होणारं आणि सेवाभावाने सजीव होणारं असलं प्रमाणिक.

संस्कृतीचं समृद्धिशील भविष्य

सजीव सांस्कृतिक धरोहर

आपलं भारत म्हणजे अतीत, वर्तमान, आणि भविष्य.

सांस्कृतिक धरोहरातील सुरंगतंत्राचं आणि सजीवतेचं एक सुंदर संगम.

ह्या संगमात भारत म्हणजेच सुरवात आणि अंत.

संस्कृतीचं आणि कलेचं भविष्य सुदृढ आणि समृद्धिशील असलं प्रमाणिक.

निष्कर्ष

माझ्या स्वप्नातील भारत म्हणजे एक सुसंस्कृत, समृद्ध, आणि सहजविकसित राष्ट्र.

ह्या स्वप्नातील भारताचं रूपांतर होऊन, स्वप्न आणि अद्भुत सांस्कृतिक धरोहर सुचलंकृत करण्याचं आणि भविष्य सुनिर्भर बनवण्याचं अभियांत्रण असं प्रमाणिक.

"स्वप्न, असंतुष्टीचं मूल आहे," परंतु माझ्या स्वप्नातील भारताचं स्वप्न सुप्रभात!

माझ्या स्वप्नातिल भारत निबंध मराठीत 100 शब्दात

माझ्या स्वप्नातील भारत हे अद्वितीय राष्ट्राचं स्वप्न, संवेदनशीलतेचं आणि सुरंगतंत्राचं क्षेत्र.

आपलं भारत, समृद्ध, सांस्कृतिक, आणि सामाजिक सुधारणारं आदर्श राष्ट्र.

या स्वप्नातील भारताचं उद्दीपन, स्वास्थ्य, शिक्षण, आणि समृद्धीसंबंधित योजनांमुळे सुचलंकृत होणारं आणि भविष्यातलं सुंदर आणि समृद्ध दृष्टिकोन साकारणारं असं प्रमाणिक.

माझ्या स्वप्नातिल भारत निबंध मराठीत 150 शब्दात

माझ्या स्वप्नातील भारत हे एक विशेष आणि उत्कृष्ट राष्ट्र आहे.

या स्वप्नात, समृद्धी, सांस्कृतिक सौंदर्य, आणि सामाजिक सुधारणांचं संगम होतं.

भारत म्हणजे योग्य आणि आत्मनिर्भर राष्ट्र, ज्ञानाचं आणि सेवेचं केंद्र.

सांस्कृतिक धरोहर, वैज्ञानिक अभियांत्रण, आणि सामाजिक जागरूकता भारताचं अभियांत्रणाचं स्वरूप आहे.

ह्या स्वप्नातील भारताचं सुधारित आणि समृद्ध भविष्य, सर्वांगी साकारणारं असं प्रमाणिक.

भविष्यात, माझ्या स्वप्नातील भारत हे एक आदर्श राष्ट्र आणि सजीव धरोहर बनवणारं आहे.

माझ्या स्वप्नातिल भारत निबंध मराठीत 200 शब्दात

माझ्या स्वप्नातील भारत हे एक अद्वितीय दृष्टिकोण आहे, ज्यात स्वप्न, समृद्धी, आणि सुधारणांचं अद्भुत संगम होतं.

या स्वप्नात, आपलं भारत समृद्ध आणि सांस्कृतिक परंपरांचं उत्कृष्ट संगमस्थल म्हणून परिचित आहे.

भारताचं संस्कृतीसाठी मातृभूमी एक पवित्र गाव आहे.

या स्थळावर आपलं समर्थन आणि समृद्ध आणि सामाजिक उत्कृष्टतेसाठी आकांक्षा करणं हे एक स्वप्न आहे.

स्वतंत्रतेच्या अदृष्टकालात, आपलं भारत स्वदेशी आंदोलन आणि आत्मनिर्भरतेचं मुद्दाम करण्यात सफल झालं.

आपलं भारत एक उदार आणि अतुलनीय दृष्टिकोणाने विश्वात चमकणारं आणि परिचित होऊन चलणारं आहे.

आपलं स्वप्नातील भारत, समृद्ध, सांस्कृतिक, आणि सामाजिक सुधारित आदर्श राष्ट्र बनविणारं आहे.

या स्वप्नातील भारताचं भविष्य, एक सुंदर आणि समृद्ध दृष्टिकोणाने साकारणारं असं प्रमाणिक.

माझ्या स्वप्नातिल भारत निबंध मराठीत 300 शब्दात

माझ्या स्वप्नातील भारत हे एक सुंदर आणि समृद्ध राष्ट्र, ज्यात सांस्कृतिक समृद्धी, सामाजिक सुधारणा, आणि आत्मनिर्भरतेचं संगम होतं.

ह्या स्वप्नात, भारताचं रूप सांस्कृतिक धरोहर, अनुसंधानात्मक अभियांत्रण, आणि सामाजिक सांघटनाचं साकारणारं आहे.

स्वतंत्रतेच्या चंद्रकाळानंतर, भारताचं स्वप्न स्वदेशी आंदोलन आणि आत्मनिर्भरतेचं संघर्ष केलं.

ह्या क्षणानंतर, भारताचं स्वरूप सुदृढ, उजवणारं, आणि समृद्ध राष्ट्र विकसलं.

संस्कृतीतलं संपूर्णता, कला, आणि साहित्य, यात्रेत एक अद्वितीय वर्तन आहे.

ह्या शिक्षणात्मक धरोहरातील विशेषत्व, भारतीय सांस्कृतिक सौंदर्य, विचारशीलता, आणि भारतीय समृद्धीसाठीचं प्रमाणात आलंय.

आपलं भारत आत्मनिर्भर, स्वदेशी, आणि सामाजिक सुधारित राष्ट्र.

महात्मा गांधींचं स्वदेशी आंदोलन आणि डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक सुधारणात्मक योगदान ह्या स्वप्नातील भारताचं अद्वितीय स्थान देतात.

स्वप्न, समृद्धी, आणि सुधारणा हे भारताचं संकल्प.

भविष्यात, या स्वप्नातील भारताचं भविष्य एक उजवल आणि सुदृढ दृष्टिकोणाने साकारणारं असं प्रमाणिक.

हे एक साने आणि सुप्रभात स्वप्न, हे एक आदर्श राष्ट्र.

माझ्या स्वप्नातिल भारत निबंध मराठीत 500 शब्दात

माझ्या स्वप्नातील भारत हे एक अद्वितीय आणि सुप्रभात स्वप्न आहे.

या स्वप्नात, भारत म्हणजे समृद्धीचं, सांस्कृतिक धरोहराचं आणि समृद्ध आणि समृद्धीचं अद्भुत संगम.

ह्या स्वप्नातील भारताचं दर्शन, सर्व क्षेत्रांमध्ये सुदृढ आणि आदर्श राष्ट्र असणं आहे.

भारतीय संस्कृती आणि कला

भारतीय संस्कृती म्हणजेच एक अत्यंत विविध, आणि समृद्ध धरोहर.

ह्या संस्कृतीतलं आणि कलेतलं सौंदर्य, विचारशीलता आणि भूमिकांतर सर्वभूत होतं.

भारताचं सांस्कृतिक धरोहर हे विश्वातील सर्वांगी ओळखलेलं, आणि अद्भुततमं साने आहे.

या संस्कृतीतलं बृहत्तर योगदान, वेद, उपनिषदें, आणि महाभारताचं अमृततुल्य अद्वितीयतेचं प्रमाणात आलंय.

स्वदेशी आंदोलन आणि आत्मनिर्भरता

स्वतंत्र भारताचं सुरुवात हे हमारं स्वप्न सकारायचं म्हणूनच केलं.

स्वतंत्रतेच्या दिवसांतर्फे, स्वदेशी आंदोलन या स्वप्नातील भारताचं एक महत्त्वाचं पहिलं प्रधान ध्यासात आलंय.

आत्मनिर्भरतेचं सिद्धांत आणि स्वदेशीचं आंदोलन ह्या स्वप्नातील भारताचं निर्माण करण्यासाठी आपलं समर्थन दिलं.

गांधीजींचं आत्मनिर्भर औपचारिक आणि आपलं स्वदेशी असलं ह्यांना आपलं भारत आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासी असलं पहिलं ध्यासात आलंय.

आपलं भारत हे एक विचारशील आणि आध्यात्मिक राष्ट्र.

सजीवशास्त्र, योग, आणि आयुर्वेद यांनी ह्या स्वप्नातील भारताचं आपलं स्वदेशी आणि आत्मनिर्भर स्वास्थ्य व्यवस्थापन केलं.

ह्या संस्कृतीतलं आणि विज्ञानात्मक अभियांत्रणातील संगमातून भारताचं स्वप्न सुरक्षित आणि सांस्कृतिक धरोहर सुरक्षित आणि सुरक्षित केलं.

सामाजिक सुधारणा आणि सेवाभाव

स्वप्नातील भारताचं सामाजिक सुधारित असलं पहिलं आणि प्रमुख ध्यासात आलंय.

आपलं भारत सामाजिक सुधारणेचं आदर्श असलं, ज्यात समाजातील सर्व वर्गांना समानता, न्याय, आणि सामाजिक सुरक्षा मिळवायचं असलं.

भारताचं सेवाभाव हे हमारं स्वप्नातील भारताचं मुख्य क्रमश: विशेषत्व आहे, ज्यात सेवेचं मूल्य आणि भगवानाचं पूजन म्हणजेच आहे.

भविष्यातलं दृष्टिकोण

आपलं स्वप्नातील भारत एक विचारशील, समृद्ध, आणि समृद्धीसंबंधित राष्ट्र.

सुधारित आणि अद्भुत विकासासाठी या स्वप्नातील भारताचं स्वतंत्र, सकारात्मक, आणि सुरक्षित दृष्टिकोण योग्य आहे.

भविष्यात, या स्वप्नातील भारताचं भविष्य एक उजवल, समृद्ध, आणि समृद्धिशील देशाचं असं प्रमाणिक.

आपलं स्वप्न, आपलं भारत हे हमारं अद्वितीय स्वप्न, ज्यात सर्वांगी समृद्धी, सुधारणा, आणि समृद्धीचं संगम होतं.

माझ्या स्वप्नातील भारत 5 ओळींचा मराठीत निबंध

  • सांस्कृतिक समृद्धी: माझ्या स्वप्नातील भारत हे सांस्कृतिक समृद्धीचं आणि सौंदर्याचं केंद्र आहे.
  • स्वदेशी आणि सामाजिक सुधारणा: स्वतंत्रतेच्या विजयात, स्वदेशी आंदोलन आणि सामाजिक सुधारणेतील एक सशक्त आणि आत्मनिर्भर भारत स्वप्नात सकारायचं.
  • विज्ञान आणि सेवाभाव: भारतीय विज्ञान, आयुर्वेद, आणि सेवाभाव यांनी स्वप्नातील भारताचं रूपांतर केलं आहे.
  • आत्मनिर्भर आणि सुरक्षित भविष्य: आपलं स्वप्न, भारताचं आत्मनिर्भर आणि सुरक्षित भविष्य साकारण्यात सजीव होतं.
  • समृद्ध आणि सामाजिक संघटन: स्वप्नातील भारताचं सर्वांगी समृद्ध आणि सामाजिक संघटन हे एक सजीव राष्ट्र रूपांतर करणारं आहे.

माझ्या स्वप्नातील भारत 10 ओळींचा मराठीत निबंध

  • स्वतंत्र भारताचं संकल्प: माझ्या स्वप्नातील भारत हे स्वतंत्र आणि समर्थ राष्ट्र, ज्ञानाचं आणि सेवेचं केंद्र आहे.
  • आपलं सांस्कृतिक धरोहर: भारताचं सांस्कृतिक धरोहर एक अद्वितीयतेचं, विश्वातील सर्व भूमिकांतर सर्वथिक प्रमाणात आलंय.
  • स्वप्नातील भारताचं विजयी संघर्ष: आत्मनिर्भरतेचं महामंत्र, स्वप्नातील भारताचं या विजयी संघर्षात साकारायचं.
  • महान व्यक्तित्वांचं योगदान: महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक आणि योगदान भारताचं गर्वशील स्वप्न.
  • भविष्य आणि आत्मविश्वास: स्वप्नातील भारत हे सजीव, सुदृढ, आणि आत्मविश्वासी भविष्य साकारण्यात आहे.

माझ्या स्वप्नातील भारत 15 ओळींचा मराठीत निबंध

  • महान व्यक्तित्वांचं योगदान: महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक आणि सार्वभौमिक योगदान भारताचं गर्वशील स्वप्न.
  • सामाजिक सांघटन आणि न्याय: भारताचं स्वप्न सामाजिक सांघटनात, न्यायाचं सुधारणात आणि समाजातील सर्व वर्गांसाठी समानता साकारणारं आहे.
  • प्रौढीकरण आणि विद्यार्थ्यांचं समर्थन: स्वप्नातील भारतात, विद्यार्थ्यांसाठी योजनाएं, सुविधांचं समर्थन आणि प्रौढीकरणाचं प्रमुख माध्यम आहे.
  • पर्यावरणाचं संरक्षण: भारताचं स्वप्न पर्यावरणाचं संरक्षण आणि साक्षरतेचं गर्वशील समाज तयार करण्यात समर्थ आहे.
  • आत्मनिर्भरतेचं उत्कृष्ट उदाहरण: स्वप्नातील भारताचं आत्मनिर्भरतेचं उत्कृष्ट उदाहरण, स्वदेशी उत्पादनातील विश्वातील नेतृपद्धती आहे.
  • बौद्धिक स्थानीयता आणि विकास: स्वप्नातील भारताचं बौद्धिक स्थानीयता, आधुनिकतेचं साने आहे आणि या माध्यमातून समृद्ध विकास साकारण्यात सक्षम आहे.

माझ्या स्वप्नातील भारत 20 ओळींचा मराठीत निबंध

  • सुरक्षित समाज आणि सार्वभौमिक स्वास्थ्य: स्वप्नातील भारतात, सुरक्षित समाज आणि सर्वांगी स्वास्थ्य प्रक्रियां एक प्राथमिकता.
  • कृषी आणि ग्रामीण विकास: स्वप्नातील भारताचं कृषी आणि ग्रामीण विकास, आत्मनिर्भर गावांचं विकास केंद्र.
  • विकसित और न्यायमूर्ती भारत: स्वप्नातील भारताचं विकसित आणि न्यायमूर्ती राष्ट्र, आपल्या नागरिकांसाठी एक आदर्श.
  • कला आणि साहित्याचं महत्त्व: स्वप्नातील भारतात, कला आणि साहित्याचं महत्त्व वाढवून, सांस्कृतिक धरोहर सुरक्षित करणे.
  • साकारात्मक शिक्षण आणि तंत्रज्ञान: स्वप्नातील भारतात, साकारात्मक शिक्षण आणि तंत्रज्ञानाचं प्रगट विकास, राष्ट्राचं अग्रणी बनवायचं.

या ब्लॉग पोस्टमध्ये "माझ्या स्वप्नातील भारत" हे मुख्य कीवर्ड अत्यंत महत्त्वाचं आहे.

आपलं स्वप्न, आपलं भारत हे हमारं आत्मनिर्भर, समृद्ध, आणि समृद्धीशील राष्ट्राचं स्वप्न आहे.

आपलं भारत सोडवणं, सुधारणं, आणि समृद्ध करणं आपलं कर्तव्य आहे.

या ब्लॉग पोस्टनंतर आपलं मातृभूमीवर आपलं कर्तव्य येथे समाप्त होतं.

आपलं स्वप्न आणि क्षितीजाचं प्रेम, सेवेचं मूल्य, आणि समृद्ध भविष्याचं विश्वास हे आपलं भारत बनवण्यातील मार्गदर्शन करतं.

ह्या स्वप्नातील भारताचं साकारात्मक रूपांतर करण्यात आपलं सक्रिय सहभागी असणं हे हमारं दायित्व आहे.

आपलं स्वप्न, आपलं भारत हे अद्वितीय आणि समृद्ध भविष्याचं संकल्प करण्यात योग्य आहे.

आपलं स्वप्नातील भारत साकारायचं, हे आपलं सर्वांगी सहमत आहे.

Thanks for reading! माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी | Mazya Swapnatil Bharat essay in Marathi you can check out on google.

टिप्पणी पोस्ट करा

bharat maza desh nibandh

माझा भारत देश निबंध 2023 | Bharat Maza Desh Nibandh 2023

आजच्या लेखामध्ये आपण भारत माझा देश हा निबंध अभ्यासणार आहोत भारत माझा देश हा निबंध अभ्यासल्यानंतर आपल्याला आपल्या भारत देशातील अनेक जमेच्या बाजू समजणार आहेत. यावरच आधारित आपण भारत एक महासत्ता हा निबंध वाचा नि आपल्या भारत देशाविषयी असलेला स्वाभिमान अजून वाढीस लावा, म्हणून तर आज भारत माझा देश हा निबंध आपण आज अभ्यासणार आहोत.

माझा भारत देश निबंध

भारत देश हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सातव्या क्रमांकावर आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.विविधता हे आपल्या भारत देशाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य!भाषा,जात,धर्म,संस्कृती या प्रत्येक बाबतीत विविधता आढळते.पण तरीही भारतीय एकात्मता टिकून आहे.भारत देशाने ज्ञान,क्रीडा,अध्यात्म,धर्म,गणित,तत्त्वज्ञान,कला,संस्कृती,खगोल,इतिहास ,भाषा – साहित्य अशा अनेक बाबतीत पूर्ण विश्वाला नेहमीच मोठा वारसा दिलेला आहे.संत कबीर,गौतम बुद्ध, छ्त्रपती शिवाजी महाराज,आर्यभट्ट ,कालिदास, यांसारख्या महान – विद्वान व्यक्तिमत्त्वांनी संपन्न झालेली ही भारतभूमी आहे.

आपण शाळेत असताना ” भारत माझा देश आहे…” अशी प्रतिज्ञा म्हणायचो.चला तर मग आपल्या देशाविषयी अधिक जाणून घेऊ या.

‘भारत ‘ या नामाबरोबरच ‘ India ‘ असे देखील आपल्या देशाला संबोधले जाते. स्वातंत्र्यापूर्वी ‘ हिंदूस्थान ‘ अशा नावानेही आपल्या देशाला ओळखले जाई.भारताच्या वायव्येला विशालकाय ‘ सिंधू ‘ नदी वाहते. तेव्हा सिंधू नदीच्या पलीकडील भूमी सिंधूस्थान म्हणून ओळखली जाऊ लागली. कालांतराने अपभ्रंश होऊन सिंधूचे हिंदू ,आणि नंतर हिंदूस्थान असे नाव रूढ झाले.परंतु इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले,तेव्हा खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला.राष्ट्र किंवा देश या संकल्पना आपण बऱ्याचदा एकाच अर्थाने वापरतो.पण केवळ एकाच भूमीवर राहतो,म्हणून तेथील नागरिक एक नसतात,जरी वेगवेगळ्या प्रांतावर एखाद्या देशातील लोक राहत असतील,पण त्यांच्यात एकात्मतेची , बंधुतेची जाणीव असेल तर तो विशिष्ट समूह ‘ राष्ट्र ‘ म्हणून ओळखला जातो.तसेच आपल्या भारत देशातील लोक स्वातंत्र्यापूर्वी फक्त एका भूमीवर राहत होते,पण एक राष्ट्र म्हणून राष्ट्रवादाची भावना त्यांना माहीतच नव्हती.म्हणून १८५७ च्या बंडाला आपण ‘ राष्ट्रीय उठाव ‘ असे म्हणू शकत नाही. इ. स.१९४७ ला आपण खऱ्या अर्थाने स्व – तंत्र,सार्वभौम आणि प्रजासत्ताक झालो.जगातील सगळ्यात मोठी ‘ लोकशाही ‘(संसदीय) आपल्या इथे उदयाला आली आणि आज तिने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.

आपला भारत देश जगातील आशिया खंडाच्या दक्षिणेस आहे.आपल्या भारत देशाचे वर्णन’ आसेतुहिमाचल ‘ असे केले जाते.याचे कारण त्याचा भौगोलिक विस्तार हा उत्तरेला हिमालय पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे.एवढेच नव्हे तर भारताच्या शेजारील देश हे हिमालयाच्या पलीकडील ” भारतीय उपखंडा ‘ त मोडणारे देश म्हणून ओळखले जातात! पूर्वेला अरुणाचल प्रदेश आहे,तर पश्चिम दिशेला गुजरात हे राज्य आहे. दक्षिणेस भारतभूमीला ‘ द्वीपकल्प ‘ (Peninsular Platue)असे म्हटले जाते कारण भारताच्या पूर्व दिशेला बंगालचा उपसागर आहे,पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर दक्षिणेला अथांग पसरलेला हिंदी महासागर आहे.अशा रीतीने भारतीय भूप्रदेश तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे.मध्ये एखादे बेट जणूकाही बाजूने पाण्याने वेढलेले असावे,तशी आपली वसुंधरा दिसते,म्हणून त्यास ‘ द्वीपकल्प ‘ असे संबोधले जाते.

भारतभूमी ही प्राकृतिक रचनेने अक्षरशः नटलेली आहे.उत्तर दिशेला गगनाला भिडणारा हिमायल पर्वत आहे.जो परकीय शत्रूंपासून भारताचे संरक्षण करतो. पूर्ण भारतीयखंडाला नैऋत्य मौसमी वारे अडवून पाऊस देतो.उत्तरेकडील अंटार्टिकासारख्या प्रदेशातून येणारे शीत वारे हिमालयामुळे अडविले जातात.तेथे खूप औषधी वनस्पती आढळतात ,त्यामुळे अनेक वन्य जीवांचे ते वसतीस्थान आहे.त्यामुळे हिमालय पर्वत भारतातील जैवविविधतेमुळे पर्यावरणास वरदान ठरला आहे.हिमायलाचे विशाल बाहू एका वडिलांप्रमाणे आपल्या भारतभूमीला कवेत घेऊन आहेत,असे वाटते.

गंगा,सिंधू,ब्रह्मपुत्रा,यमुना,साबरमती,नर्मदा,तापी,गोदावरी,महानदी,कृष्णा, कावेरी, यांसारख्या नद्यांमुळे भारताची भूमी सुपीक झाली आहे. नद्यांच्या पाण्यामुळे येथील भूमी सुजलाम – सुफलाम झाली आहे.

Bharat Maza Desh Nibandh

भारतीय स्वातंत्र्यलढा हा संपूर्ण जगाला प्रेरित करणारा इतिहासातील आगळावेगळा लढा आहे.इंग्रजांनी भारत देशाला जवळपास १५० वर्षे पारतंत्र्यात ठेवले.पण जेव्हा इथल्या लोकांना गुलामगिरीची जाणीव झाली,तेव्हा त्यांनी जो अखंड आणि अविरत लढा दिला; त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. अनेक स्वातंत्र्यसेनानींनी आणि समाजसुधारकांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. राजाराम मोहनरॉय, स्वामी विवेकानंद,महात्मा फुले, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री,महादेव रानडे, भगतसिंग, पं. नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखी अनेक रत्ने देशासाठी खर्ची पडली.तर स्वातंत्र्यानंतरही अनेक क्षेत्रातील महान व्यक्तींनी देशाला विकसनशील बनविले.डॉ,होमी भाभा,सत्यजित रे, सी. व्ही.रमण,डॉ.विक्रम साराभाई, जमशेठजी टाटा, मदर टेरेसा,डॉ. ए. पी.जे. कलाम, बाबा आमटे,इ. कर्तृत्ववान व्यक्ती भारतभूमीवर झाल्या,त्यांनी जगाला सुद्धा आपले योगदान दिले.

Also Check: माझा भारत देश निबंध 2023

सिंधू ,गंगा यांसारख्या बारमाही नद्या तसेच सुपीक भूमी,अनुकूल हवामान आणि पाऊस,इतर नैसर्गिक साधनसंपत्ती यांमुळे अगदी प्राचीन काळापासूनच इथे खूप चांगल्या नागरी (civilized) वसाहती स्थापन झाल्या.त्यांनी स्वत:ची संस्कृती निर्माण केली. हडप्पा आणि मोहेंजोदडो या प्रगत भारतीय उपखंडातील संस्कृती याचे खूप चांगले उदाहरण आहे.या संस्कृतीला जगातील पहिली प्रगत आणि समृद्ध संस्कृती म्हणून ओळखले जाते.तक्षशिला आणि नालंदा अशी जगात नावाजलेली विद्यापीठे भारतात अस्तित्वात होती.इथे जगभरातून विद्यार्थी विद्या संपादन करण्यासाठी येत असत.अशा संपन्न भूमीवर परकीयांचे लक्ष न गेले तर नवलच! भारतभूमीवर अनेक परकीय आक्रमणे झाली.त्यात मुघल,पोर्तुगीज, डच,फ्रेंच,इंग्रज अशा अनेक परकीय सत्ता होत्या. पण सगळ्या आक्रमणांना समर्थपणे तोंड देत भारत अधिक कणखर बनला.

” भारतीय संविधान ” हे तर अखंड विश्वासाठी एक आदर्श ग्रंथ आहे.जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.देशातील प्रत्येक सामान्य किंवा लहानातील लहान घटकाच्या अधिकाराची दखल घेणारे उदारमतवादी संविधान म्हणजे अगदी विकसित राष्ट्रांसाठी सुद्धा वस्तुपाठ म्हणावा लागेल.या भारतीय घटना निर्मितीमधील सिंहाचा वाटा परमज्ञानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे,याबद्दल कोणाचेही दुमत नसावे.भारतीय संविधानाने स्वातंत्र्य,समता,बंधुता,एकात्मता, धर्मनिरपेक्षता, न्यायप्रियता,यांसारखी बहुमूल्य तत्त्वे जगाला दिली.

भारताने स्वातंत्र्यानंतर लोकशाही(Democracy) शासनपद्धतीचा स्वीकार केला. १५ ऑगस्ट १९४७ हा भारताचा स्वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारी १९५० हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरे केले जातात.’ सत्यमेव जयते ‘ हे भारताचे ब्रीदवाक्य आहे.तीन रंग(केशरी,पांढरा,हिरवा) आणि मध्ये निळे अशोक चक्र असा राष्ट्रीय ध्वज भारताची शान आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले ‘ जन – गन – मन ‘ हे अखंड भारताचे राष्ट्रीय गीत आहे.नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे.सद्या भारत देशात २८ घटकराज्ये आणि ८ संघशासित( केंद्रशासित) प्रदेश आहेत.अंदमान – निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे (Island)आहेत.हिंदी ही संघराज्याची अधिकृत भाषा आहे. रुपया हे भारताचे चलन आहे.कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे,मोर हा राष्ट्रीय पक्षी,वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे. हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे.राष्ट्रपती हे देशाचे पहिले ( घटनात्मक )नागरिक मानले जातात.

ताजमहाल ही जगातील आठ आश्चर्यांपैकी एक.ती वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखली जाते. लाल किल्ला ,फत्तेपूर सिक्री, कुतुब मिनार ,खजुराहो,अजंठा -वेरूळ लेणी, दक्षिणेकडची मंदिरे, काश्मीर -मनाली सारखी थंड हवेची ठिकाणे, नयनरम्य समुद्रकिनारे, अनेक ऐतिहासिक वास्तू, संग्रहालये,नैसर्गिक स्थळे यांनी आपला भारत देश संपन्न झालेला आहे.

आज भारत देश हा एक प्रगतीपथावरील एक प्रमुख देश ओळखला जातो.भारत देशाची ओळख जरी कृषिप्रधान असली तरीदेखील आज भारताने जगाचे डोळे दिपवून टाकणारी कामगिरी प्रत्येक क्षेत्रात केली आहे.शेती,वाणिज्य, उद्योग,खगोल,विज्ञान,तंत्रज्ञान, कला,क्रीडा,संशोधन,अशा अनेक बाबतीत देशाने आजच्या युगामध्ये स्वत:चे एक वैशिष्टयपूर्ण स्थान निर्माण केले आहे.

असा हा महान भारत देश अधिक महान बनवा,यासाठी आपण प्रत्येक नागरिकाने मनापासून प्रयत्न करणे,अत्यंत गरजेचे आहे.किंबहुना ते आपल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा……

अशा पद्धतीने भारत माझा देश हा निबंध आपण अतिशय छान पणे लिहू शकता.आपण देखील अशाच पद्धतीने लिहिला पाहिजे असे नाही ,परंतु जर आपण निबंध लेखन करीत असताना याच पद्धतीने विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तर आपण देखील छान पद्धतीने निबंध लिहू शकता. हे नक्की.आमचा निबंध भारत माझा देश आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

' src=

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Detail Maza Bharat Desh Essay In Marathi In 2023 | भारत माझा देश निबंध

Maza bharat desh essay in marathi | माझा देश निबंध मराठी –  आज आपण  ईषयी नबंध आज आपण लिहणार आहोत . हा सुद्धा निबंध परीक्षांत विचारतात . हा निबंध आपण ३०० शब्दात लिहणार आहोत .

majha bharat desh essay in marathi-

Essay On Maza Desh In Marathi language

माझा भारत देश निबंध – सुजलाम सुफलाम हा माझा देश ,एके काली सोन्या ची खान , वीरांची व संतांची भूमी असा हा माझा देश .

भरत राजाच्या नावावरून या देशाचे नाव भारत पडले पण हिंदू संस्कृती असल्यामुळे या देशास हिंदुस्थान म्हणून सुद्धा ओळखले जाते .

इंग्रजांनी व पोर्तूजानी या देशाला इंडिया असे नाव ठेवले .

माझा ह्या देशात १२०० से भाषा बोलल्या जातात प्रत्येक राज्यामध्ये वेगळी भाषा तसेच वेगळी संस्कृती व वेगळे खानपान आहे . विविधतेने नटलेला हा माझा देश आहे .

वेगवेगळे पोशाख माझा देशात परिधान केले जातात . तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे पोशाख बगायला मिळतील . 

माझा देशात अनेक शूर वीर राजा होईऊन गेले अशोक सम्राट , शिवाजी महाराज , पृथ्वीनाज चौहान , चंद्रगुप्त मौर्य , आहे अनेक शूर राजा माझा देश मध्ये झाले .

तसेच कबीर , स्वामी विवेकानंद , असे थोर संत होऊन गेले . आर्यभट , चाणक्य असे संशोधक झाले . याच देशात ० चा शोध झाला 

पर्यटन स्थळ

माझ्या या भारत देशात अनेक पर्यटक स्थळ  आहेत . काश्मीर ज्याला जगातील स्वर्ग म्हणतात हे याच देशात आहे .

शिमला मनाली , अरुणाचल प्रदेश , राजस्थान चे किल्ले , महाराष्ट्र मधील ताडोबा जंगल , केरळ मधील चहाचे मले , कार्यटकांमधील म्हैसूर , तामिळनाडू मधील उटी हे प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ माझा देशामध्ये आहेत . 

माझा देशामध्ये अनेक संशोधक आले apj अब्दुल कलाम , विक्रम साराभाई , जहागीर भाभा असे अनेक संशोधक झाले .

माझा हा देश हा कृषिप्रधान देश आहे देशातील ६० % जनता हि शेती करते . गहू , तांदूळ ऊस शेती नारळ हि प्रमुख शेती उत्पादने आहेत .

माझा देशाचा सकळ उत्पादनामध्ये ५ व जगातील देशामध्ये नंबर लागतो .

माझा देशामध्ये सर्विस सेक्टर , फार्म सेक्टर मध्ये सुद्धा अतुलनीय कामगिरी केली आहे . 

माझा देश संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे आहे जगातील ४ सैनिक महाशक्ती म्हणून नाव कमावले आहे .

पृथ्वी अग्नी , प्रलय , ब्राह्मोस , अशी मिसाईल भारतने बनवली आहेत .

भारतात १४ लाख पैदल आहे . भारताची वायुसेना सुद्धा जगातील ६ नंबर ची ओटी वायुसेना आहे . 

माझा या देशा मध्ये अनेक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात त्या मध्ये हिंदू , बौद्ध , शीख , इसाई , जैन , पारशी या समाजाचे लोक राहतात . 

असा हा माझा देश आहे आणि माझे माझा देशावर्ती प्रेम आहे

भारत माझा देश निबंध | my country essay in marathi किंवा maza bharat desh essay in marathi . या विषयवार अनेक वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारात तुम्ही आता सहजरित्या हा निबंध लावू शकता .

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझी भारत भूमी मराठी निबंध, Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language

माझी भारत भूमी मराठी निबंध |Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language

Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language : विद्यार्थ्यांनो, आज आम्ही MpscMarathi Team तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत  माझी भारत भूमी मराठी निबंध . हा एक वैचारिक निबंध प्रकार आहे.

तुम्ही Mazi Bharat Bhumi Nibandh in Marathi निबंध तुमच्या शालेय किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. आमच्या वेबसाईटवर इतरही अनेक marathi nibandh उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता.

Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language

माझी भारत भूमी मराठी निबंध | Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language

‘सुजलाम, सुफलाम, मलयज शीतलाम सस्यशामलाम, मातरम, वंदे मातरम ||’

असे ज्या भूमीचे वर्णन केले आहे, ती भारत भूमी माझी मातृभूमी आहे. माझ्या भारतमातेला फार मोठी वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे. अनेक मोठे राजे, सम्राट येथे होऊन गेले. या प्राचीन देशाची संस्कृतीही महान आहे. आजही या संस्कृतीचे महात्म्य जगात शिरोधार्य मानले जाते.

भारत हा वीरांचा देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज, मेवाडचा राजा प्रताप सिंह अशा वीरांना आजही कोणी विसरू शकत नाही. त्या प्राचीन युगात भारत ही सुवर्णभूमी, ज्ञानभूमी होती. जगातील वेगवेगळ्या देशांतून माणसे येथे ज्ञान संपादन करण्यास येत होती. याचा उल्लेख अनेक चिनी प्रवाशांनी आपल्या लेखनात केला आहे.

प्राचीन काळी तत्वज्ञान, अध्यात्म यांची भूमी म्हणून माझ्या भारत भूमीला ओळखले जायचे. आजही जगातून अनेक विद्वान लोक भारतात अभ्यास करायला येतात. याबरोबरच आयुर्वेद, गणित आणि विज्ञानातील अनेक संकल्पना भारताने जगाला दिल्या आहेत. निसर्गही माझ्या भारत भूमीवर प्रसन्न आहे.

गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी इत्यादि नद्यांनी भारतभूमी सुजलाम केली आहे. त्यामुळे येथे सृष्टीची विविध रुपे पाहायला मिळतात. भव्य हिमालय आम्हापुढे उदात्ततेचा व महानतेचा आदर्शच उभा करतो.

माझ्या भारतभूमीच्या तिन्ही बाजूंना महासागर पसरलेला आहे. सागर हा अथांग आहे. रत्नांचे आगर आहे. असा हा सर्वसमावेशक सागर आमच्या मनाला विशालता देतो.

भारत भूमी ही वृक्ष, पाने, फुले व फळे याच्या दृष्टीने समृद्ध आहे. ही विविधता भारत भूमीतील सर्व माणसांत आहे.

भिन्न भाषा, धर्म, पंथ आणि भिन्न विचार यांनी माझ्या भारत भूमीची संस्कृती सजलेली आहे. विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे स्वरूप आहे.

भारतीय संस्कृती म्हणजे सहस्त्र पाकळ्यांचे कमळच जणू!

भारतात विविध भाषा बोलल्या जातात आणि या भाषांतील साहित्यही समृद्ध आहे. संस्कृत भाषा ही आमची प्राचीन भाषा आहे. या भाषेत रामायण, महाभारत यांसारखे महान ग्रंथ लिहिले गेले आहेत. भागवतगीता आजही जगाला मार्गदर्शक ठरत आहे.

भारतभूच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची कहाणीही जगाला स्फूर्तिदायक आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला अनेक नैसर्गिक संकटांना आणि परकीय आक्रमनाना तोंड त्यावे लागले. तरीही भारत अखंड राहिला. भारतात हरित क्रांति, श्वेत क्रांति आणि औद्योगिक क्रांति झाली. कोणत्याही क्षेत्रात भारत मागे राहिला नाही.

आजच्या संगणकाच्या युगातही भारताने आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणू शकतो की माझी भारत भूमी ही स्वर्गपेक्षाही श्रेष्ठ आहे.

इतर महत्वाचे निबंध  >>

  • माझा देश मराठी निबंध | Maza Desh Marathi Nibandh
  • माझा देश महान निबंध मराठी | Bharat Desh Mahan Nibandh Marathi
  • माझ्या स्वप्नातील भारत निबंध |Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

निष्कर्ष: माझी भारत भूमी मराठी निबंध

तर विद्यार्थ्यांनो हा होता Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language निबंध. आम्हाला आशा आहे की माझी भारत भूमी मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल.

तुम्ही Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language हा निबंध ‘ माझी मातृभूमी निबंध ‘, ‘ माझी मायभूमी निबंध ‘ या विषयांवर देखील लिहू शकता.

तुम्हाला ही माहिती/निबंध उपयुक्त वाटल्यास तुमच्या वर्ग मित्रांना नक्की शेअर करा. तसेच, इतर कोणत्याही विषयावर निबंध हवे असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.

' src=

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी | Mazya Swapnatil Bharat Essay In Marathi

 माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी | mazya swapnatil bharat essay in marathi.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझ्या स्वप्नातील भारत मराठी निबंध बघणार आहोत. मी एक भारतीय आहे. माझे माझ्या देशाबद्दल अतिशय सुंदर व मनोहर स्वप्न आहे. माझ्या भारतीय असण्याबद्दल मला अभिमान आहे. मला माझ्या देशाला ते पूर्वीचेच प्राचीन वैभव प्राप्त करुन द्यायचे आहे. माझ्या देशाने सर्व जगाला ज्ञान व संस्कृतीचा संदेश द्यावा असे मला वाटते. 

माझ्या देशाने आपल्या सर्व शेजारी देशांना मदत करावी व शांतीचा संदेश द्यावा. जगाचे नेतृत्व करावे. माझ्या स्वप्नातील भारत आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण असेल. येथे लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या व्यवसायांना पूर्ण स्वातंत्र्य असेल व समान सोयी उपलब्ध असतील. 

माझ्या स्वप्नातील भारतात निरक्षरता अजिबात नसेल व असे शिक्षण दिले जाईल की प्रत्येकजण स्वत:पुरते कमवू शकेल. कोणीही गरीब, भिकारी किंवा उपाशी रहाणार नाही. प्रत्येकासाठी काम असेल. स्त्रीशिक्षणावर विशेष भर दिला जाईल.

शरीर निरोगी असले तर मन ही निरोगी असते. म्हणूनच देशातील प्रत्येक खेड्यात, गावात चांगली इस्पितळे व सर्व प्रकारच्या वैद्यकिय सोयी उपलब्ध असतील. देशाचे नागरिक निरोगी असतील तर सहाजिकच देशाच्या प्रगतीत ते सहभागी होऊ शकतील. 

माझ्या देशातून जातीयता, अस्पृश्यता, जाती-भेद पूर्णपणे हद्दपार झालेले असतील. देशात मैत्रीभाव व सुखशांती नांदेल. स्त्रियांवर अत्याचार होणार नाहीत व त्यांना समान संधी मिळतील. तसेच शिक्षणावर आधारित भेदभाव भारतात नसेल.

भारत हा कृषीप्रधान देश असल्याने बळीराजाला येथे सर्वाधिक महत्त्व दिले जाईल. देशाची अन्नधान्याची गरज पूर्ण होऊ शकेल या दृष्टीने शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा व तंत्रज्ञान उपलब्ध असेल. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपण इतर देशांच्या बरोबरीने उभे रहावे असे मला वाटते.

सध्या देशाला दहशतवादी कारवायांना तोंड द्यावे लागत आहे. माझ्या देशातून युद्ध, लढाया, बाँम्बस्फोट, दहशतवाद पूर्णपणे नाहीसे झालेले असेल. कारण देश सैनिकीदृष्टया मजबूत असेल. आपल्या कडील अणूविज्ञानाचा उपयोग आपण मानवाच्या कल्याणासाठी करु व शांततेचा संदेश सर्व जगाला देऊ. 

अशा प्रकारे माझ्या स्वपनातील भारत हा गांधीजींनी दाखवून दिलेल्या सत्य व अहिंसेच्या मार्गावरून चालणारा असेल. तो खऱ्या अर्थाने जगातील महासत्ता असेल व नेहमी न्यायपूर्ण मार्गानेच वाटचाल करेल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Learning Marathi

माझी भारतभूमी मराठी निबंध | Mazi Bharat Bhumi Essay In Marathi

Mazi Bharat Bhumi Essay In Marathi : भारतभूमी ही अशी जागा आहे जिथे आपण आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचा जन्म होतो. आपल्यापैकी प्रत्येकाची आपल्या मातृभूमीशी निगडित भावना आहे. मातृभूमी ही एक अशी जागा आहे जिथे आपण आपल्या आयुष्यातील बहुतेक वर्षे घालवता. ही अशी जागा आहे जिथे तुमचा जन्म झाला आणि लहानाचा मोठा झाला आणि बहुधा तुमचे शालेय शिक्षण किंवा अगदी महाविद्यालयीन , काही प्रकरणांमध्ये. या निबंधात, तुम्हाला मनोरंजक मुद्दे कळतील जे तुम्ही तुमच्या मातृभूमीच्या निबंधात जोडू शकता.

Table of Contents

Mazi Bharat Bhumi Essay in Marathi | माझी भारतभूमी मराठी निबंध (निबंध – 1)

माझी मातृभूमी भारत आहे. भारत हा खूप मोठा देश आहे. त्याला भारत आणि हिंदुस्थान असेही म्हणतात. त्याची मातृभाषा हिंदी आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे. जे एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाण आहे.

भारत हा लोकशाही देश आहे त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचे नेते निवडण्याचा अधिकार आहे. मी जगात कुठेही गेलो तरी माझ्या मातृभूमीने मला दिलेले प्रेम आणि आपुलकी मला कायम स्मरणात राहील.

भारत हे एक अतिशय प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे जिथे पर्यटक वेगवेगळ्या देशांना भेट देतात. माझ्या मातृभूमीचे प्रमुख आकर्षण म्हणजे दिल्ली , गोवा, जयपूर, केरळ आणि मुंबई. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर देखील आहे.

जर आपण भारतातील पर्यावरणाबद्दल बोललो तर आपण हिवाळा, उन्हाळा, वसंत ऋतु आणि शरद ऋतू अशा सर्व ऋतूंचा आनंद घेऊ शकता. जर तुमचा जन्म भारतात झाला असेल तर तुम्हाला तुमच्या देशाचा आणि विज्ञान, फॅशन, आरोग्यसेवा आणि संरक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ आणि विकासाचा अभिमान वाटला पाहिजे.

Mazi Bharat Bhumi Essay in Marathi | माझी भारतभूमी मराठी निबंध (निबंध – 2)

India, ज्याला अनेकदा भारत म्हणून संबोधले जाते, ही माझी मातृभूमी आहे, एक देश ज्याने माझ्या जन्मापासून माझे पालनपोषण केले आहे. दक्षिण आशियामध्ये स्थित, हा विविधतेचा देश आहे, ज्यामध्ये असंख्य संस्कृती, भाषा, धर्म आणि परंपरा आहेत. त्याचा समृद्ध इतिहास आणि वारसा, त्याच्या आशादायक भविष्यासह, ते एक्सप्लोर करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी एक आकर्षक ठिकाण बनवते.

भारताच्या संस्कृती आणि भाषा

भारत ही भगवान शिव आणि भगवान कृष्ण, बुद्ध आणि महात्मा गांधी यांची स्वप्नभूमी आहे, ती मंदिरे आणि मशिदींची नर्सरी आहे. माझ्या दृष्टीने भारत हा सर्वांत पहिला आहे. माझे मातृभूमी भारतावर प्रेम आहे. भारत हा एक असा देश आहे जिथे लोक वेगवेगळ्या जाती, पंथ, धर्म आणि संस्कृतीचे आहेत आणि ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताला “ विविधतेत एकता ” देश म्हणण्यामागचे हे प्रमुख कारण आहे.

भारत अध्यात्म, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. भारतातील लोक हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, बौद्ध, ख्रिश्चन अशा विविध धर्माचे आहेत, जे देशाच्या प्रत्येक भागात एकत्र राहतात. हे देशाचा कणा असलेल्या शेती आणि शेतीसाठी देखील प्रसिद्ध आहे, ते आपल्या देशात उत्पादित अन्नधान्य आणि इतर वस्तू वापरते. भारत आपल्या पर्यटन स्थळांसाठी देखील प्रसिद्ध आहे कारण भारताचे सौंदर्य जगभरातील लोकांना भुरळ घालते.

भारताच्या भूगोल आणि संस्कृती

जगात भारताची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला भारत, हिंदुस्थान आणि कधी कधी आर्यवर्त असेही म्हणतात. पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंद महासागर या तीन बाजूंनी महासागरांनी वेढलेले आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. “जन गण मन” हे भारताचे राष्ट्रगीत आहे. “वंदे मातरम्” हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे.

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हिंदू, बौद्ध, जैन, शीख, इस्लाम, ख्रिश्चन आणि यहुदी धर्म अशा विविध धर्माचे लोक प्राचीन काळापासून एकत्र राहतात. भारत स्मारके, थडगे, चर्च, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, संग्रहालये, निसर्गसौंदर्य, वन्यजीव अभयारण्ये, वास्तुशिल्पाची ठिकाणे आणि इतर अनेक गोष्टींनी समृद्ध आहे. महान नेते आणि स्वातंत्र्यसैनिक हे भारतातील आहेत.

भारताच्या पर्यटन स्थळ

स्मारके, थडगे, चर्च, स्थापत्य ऐतिहासिक ठिकाणे इत्यादींनी ते समृद्ध आहे. त्यासाठी ते उत्पन्नाचे साधन आहे. भारत एक असे ठिकाण आहे जिथे ताजमहाल, फतेहपूर सिक्री, सुवर्ण मंदिर, कुतुबमिनार, लाल किल्ला, उटी, निलगिरी, काश्मीर, खजुराहो, अजिंठा आणि एलोरा लेणी सारखी आश्चर्ये आहेत.

हा महान नद्या, पर्वत, दऱ्या, तलाव आणि महासागरांचा देश आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे. भारतात 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत, 29 राज्यांमध्ये अनेक छोटी गावे आणि शहरे आहेत. शेतजमिनी मुख्यतः ऊस, कापूस, ताग, तांदूळ, गहू, धान्य आणि इतर अनेक पिके घेतात.

भारताच्या आर्थिक प्रगती

भारत ही वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आव्हाने असूनही, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्याने लक्षणीय प्रगती केली आहे. नाविन्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकतेच्या भावनेने भरलेले देशाचे तरुण हे या वाढीमागील प्रेरक शक्ती आहेत.

भारताच्या प्रसिद्ध व्यक्ती

भारत हा महान नेत्यांचा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा देश आहे. आपल्या भारताचे दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय जवान सीमेवर आहेत. छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इत्यादी महान नेते जगदीशचंद्र बोस, डॉ. होमी भाभा, डॉ. सी.व्ही. रमण, डॉ. नारळीकर, इ. मदर तेरेसा , पांडुरंग शास्त्री अल्फाविले, टी.एन. हे महान लोक ज्यांचा जन्म भारतात झाला. आपल्याकडे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. त्याच्या कुशीत जगातील विविध धर्मांचे आनंदी अनुयायी आहेत. आपली एक अनोखी संस्कृती आहे जी शतकानुशतके विकसित झाली आहे.

भारत हा महान नेत्यांचा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा देश आहे. आपल्या भारताचे दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय जवान सीमेवर आहेत. छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इत्यादी महान नेते जगदीशचंद्र बोस, डॉ. होमी भाभा, डॉ. सी.व्ही. रमण, डॉ. नारळीकर, इ. मदर तेरेसा, पांडुरंग शास्त्री आठवले यांसारखे सुधारक महान आहेत. भारतात जन्मलेले लोक. आपल्याकडे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. त्याच्या कुशीत जगातील विविध धर्मांचे आनंदी अनुयायी आहेत. आपली एक अनोखी संस्कृती आहे जी शतकानुशतके विकसित झाली आहे.

भारत, माझी मातृभूमी, केवळ भौगोलिक अस्तित्वापेक्षा अधिक आहे. विविध संस्कृती , परंपरा आणि इतिहास यांचे हे दोलायमान मिश्रण आहे. ही एक अशी भूमी आहे ज्याने साम्राज्यांचा उदय आणि पतन पाहिले आहे, त्रास सहन केला आहे आणि लवचिक उदयास आला आहे. हा एक देश आहे ज्याने मला एकता, सहिष्णुता आणि विविधतेचा आदर ही मूल्ये शिकवली आहेत. मी भविष्याकडे पाहत असताना, भारतामध्ये असलेल्या संभाव्यतेबद्दल मी आशावादाने भरलेला आहे आणि प्रगती आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा मला अभिमान आहे.

हेही वाचा –

My Favourite Book Essay In Marathi Veleche mahatva essay in Marathi Shikshanache Mahatva Essay in Marathi My School Essay In Marathi

भारताची राजधानी कोणती आहे?

भारताची राजधानी दिल्ली आहे.

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे.

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे.

माझा भारत महान का आहे?

एका वेबसाईटने उद्धृत केले आहे की, श्री. राजीव गांधी जेव्हा 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रचार करत होते, तेव्हा त्यांना “मेरा भारत महान [माझा भारत महान आहे]” असे म्हणण्याची आवड होती. एका टीव्ही जाहिरातीने हा वाक्प्रचार आकर्षक ट्यूनमध्ये सादर केला.

भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?

भारताचे राष्ट्रीय फूल कमळाचे फूल आहे.

नमस्कार मित्रांनो माझे नाव “Rajesh Pahan” आहे मी learningmarathi.in वेबसाइटचा संस्थापक आहे. मी गेली ३ वर्षे ब्लॉगिंग करत आहे, ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की मी मराठीत सर्व लोकांना योग्य माहिती देऊ शकेन.

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

माझा महाराष्ट्र निबंध मराठी | Maza Maharashtra Nibandh Marathi Essay

माझा महाराष्ट्र निबंध मराठी - Maza Maharashtra Nibandh | My Maharashtra Essay in Marathi

मित्रांनो महाराष्ट्राच्या मराठी मातीचा इतिहास फार प्राचीन आहे. अनेक वीरांच्या बलिदानाने हा महाराष्ट्र बनलेला आहे. आज महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वाधिक उद्योगधंदे असलेले आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. 

आजच्या या लेखात आपण   Maza maharashtra nibandh पाहणार आहोत. महाराष्ट्रातील मुंबई शहराला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. माझा महाराष्ट्र ह्या मराठी निबंधापासून प्रेरणा घेऊन आपण आपल्या शाळेत सोप्या पद्धतीने स्वतः चा मराठी निबंध लिहू शकतात. 

essay in marathi maza bharat

1) माझा महाराष्ट्र निबंध | Maza Maharashtra Nibandh

 मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!

प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा ||

1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तरीही यापूर्वीच महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभला होता. महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. महा आणि राष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले , जहाल मताचे प्रवर्तक लोकमान्य टिळक , स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक अनमोल रत्ने याच मातीत जन्माला आली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या सारख्या ज्ञानी संतांनी सुद्धा इथेच जन्म घेतला. 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर , विक्रमादित्य सुनील गावस्कर, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, स्वर सम्राट पंडित भीमसेन जोशी व अविरत समाजकार्य करणारे बाबा आमटे इत्यादी सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्यांनी आपल्या शौर्याने कर्तबगारीने महाराष्ट्राचे नाव जगात अजरामर केले. 

माझा महाराष्ट्र डोंगरदऱ्यांनी, शिवबाच्या गड-किल्ल्यांनी सजला आहे. गोदावरी सारख्या मोठ्या नद्या अजिंठा-वेरूळ सारखी देखणी प्राचीन लेणी, विद्येचे माहेरघर पुणे, अमाप निसर्गसौंदर्याने नटलेला कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे.मुंबई महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी आहे. नागपुर ही महाराष्ट्राची उप राजधानी आहे. महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर उंच आहे. महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक तसेच क्षेत्रफळात तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे. ज्यामुळे राज्याला दरवर्षी देश-विदेशातून करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. माझ्या महाराष्ट्राचे राज्य फूल ताम्हण तर राज्यफळ आंबा आहे.

मराठी भाषा महाराष्ट्राची समृद्ध भाषा, मायबोली आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू तर राज्यपक्षी हरियाल आहे. गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील महत्वपूर्ण सण आहे. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात दहा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असा हा सर्वांगसुंदर महाराष्ट्र मला अत्यंत प्रिय आहे. 

बहु असोत सुंदर संपन्न की महा |

प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा ||

2) माझा महाराष्ट्र मराठी निबंध | Majha Maharashtra Nibandh Marathi 

महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. महा व राष्ट्र. या शब्दाचा शाब्दिक अर्थ होतो महान राष्ट्र. महाराष्ट्र हा बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नवरोजी, वीर सावरकर, गोपाल कृष्ण गोखले इत्यादी महान नेत्यांची जन्मभूमी आहे. महाराष्ट्राला श्रीमंत व संपन्न राज्यांमध्ये शामिल केले जाते. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या सोबतच देशाची आर्थिक राजधानी देखील आहे.  मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात भारतातील सर्वात अग्रगण्य राज्य आहे. भारतातील एकूण उत्पादनाच्या जवळपास एक चतुर्थांश भाग महाराष्ट्रात तयार होतो.

याशिवाय महाराष्ट्र त्याची विशिष्ट भौगोलिक ओळख व सांस्कृतिक वारसेमुळे विशेष ओळखला जातो. महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वत आहे. पश्चिमेला अरबी सागर स्थित आहे. महाराष्ट्रातील अधिकांश भागातील जागा बेसाल्ट खडकापासून निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वात उंच पर्वत कळसुबाई आहे या पर्वताची उंची 1646 मिटर आहे. महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्या गोदावरी, कृष्णा, भीमा, नर्मदा, वैनगंगा, कोयना, पंचगंगा, मुळा मुठा इत्यादी आहेत

महाराष्ट्राचा इतिहास खूप जुना आहे. महाराष्ट्रात वर्तमान काळात 12 करोड पेक्षा जास्त लोक राहतात. महाराष्ट्र सभ्य प्रदेश म्हटले जाते. येथील जवळपास अर्धी लोकसंख्या शहरात राहते. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र संपन्न राज्य आहे. महाराष्ट्रात अनेक प्राचीन गुहा, वस्तुशिल्प व पर्यटन स्थळे आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील पुणे शहरात अनेक दर्शनीय स्थळ आहेत. औरंगाबाद मधील अजंठा-वेरूळ च्या गुहा ऐतिहासिक कलाकृती म्हणून प्रसिद्ध आहेत. 

महाराष्ट्रात हिंदू जनसंख्या अधिक आहे येथील प्रमुख सण गणेश चतुर्थी हा आहे, परंतु याशिवाय दीपावली होळी , दसरा, ईद , नाताळ इत्यादी सणही मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. महाराष्ट्र हे जवळपास सर्वच गोष्टींमध्ये एक संपन्न राज्य आहे. महाराष्ट्राला प्राचीन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.

Maza Maharashtra Esaay Marathi 

WATCH VIDEO:

या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत  माझा महाराष्ट्र निबंध मराठी शेअर केला आहे. Maza maharashtra nibandh मध्ये महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृति, जीवनशैली आणि प्रगती इत्यादींचे विवरण केले आहे. 

तुम्हाला माझा महाराष्ट्र हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा व माझा महाराष्ट्र मराठी निबंध ला इतरांसोबतही नक्की शेअर करा. धन्यवाद

वाचा>  महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे   

1 टिप्पण्या

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

IMAGES

  1. essay on majha Bharat desh in Marathi for kid easy pronunciation

    essay in marathi maza bharat

  2. निबंध/Maza Desh nibandh /माझा देश निबंध मराठी । Maza Desh nibandh in

    essay in marathi maza bharat

  3. 5+ भारत देश महान निबंध

    essay in marathi maza bharat

  4. माझा भारत देश मराठी निबंध

    essay in marathi maza bharat

  5. माझा देश मराठी निबंध || Majha desh marathi nibandh || maza desh nibandh

    essay in marathi maza bharat

  6. माझा देश मराठी निबंध

    essay in marathi maza bharat

VIDEO

  1. सहल निबंध मराठी

  2. माझी आई मराठी निबंध // Mazi aai nibandh marathi // Mazi aai essay in marathi // 10 of 10 marks

  3. माझा भाऊ मराठी निबंध/essay on my brother in marathi/#shorts

  4. माझी आई मराठी निबंध

  5. Maza Bharat Desh

  6. Indian pledge|Bharat maza desh aahe|मराठी प्रतिज्ञा |भारत माझा देश आहे.#pratidnya #indianpledge

COMMENTS

  1. माझ्या स्वप्नातील भारत निबंध Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

    Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi माझ्या स्वप्नातील भारत…. हे गीत ऐकले की आपल्या डोळ्यासमोर आपल्या प्रिय भारत देशाचा तिरंगा वाऱ्याच्या संगे लहरताना ...

  2. माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी

    तर मित्रानो हा होता माझ्या स्वप्नातील भारत निबंध (M azya Swapnatil Bharat Essay in Marathi) या विषयावरचा निबंध तुम्हाला हा निबंध कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.

  3. माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी

    Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi :- मित्रांनो आज आपण माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला

  4. My Country Essay in Marathi, Maza Bharat Desh Nibandh, My India देश

    National Integrity Essay in Marathi | Rashtriya Ekatmata Importance 22 thoughts on "My Country Essay in Marathi, Maza Bharat Desh Nibandh, My India देश" Kaustubh Sep 2, 2020 at 2:36 pm

  5. माझ्या स्वप्नातील पाहिलेला भारत निबंध मराठी

    Mazya Swapnatil Bharat essay in Marathi: वैविध्यपूर्ण संस्कृती आणि समृद्ध वारसा ...

  6. Maza bharat mahan nibadh

    My country essay in Marathi; Bharat maza desh aahe yavar nibandh; Bhrat desh nibandh; Bharat desh mahan nibandh; Essay in mrathi maza desh; Nivandh in Marathi maza desh; माझा देश निबंध मराठी; माझा देश निबंध

  7. Mazya Swapnatil Bharat Nibandh

    Maza Desh Bharat Essay | Maza Desh Bharat Nibandh | माझा देश भारत मराठी निबंध ... Marathi Essay. पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना ...

  8. Maza Bharat Desh Mahan Nibandh In Marathi

    August 30, 2021 by Marathi Mitra. माझा भारत देश महान निबंध मराठी | Maza Bharat Desh Mahan Nibandh In Marathi. भारतीय नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. मी ज्या देशांमध्ये राहतो त्या ...

  9. भारत माझा देश मराठी निबंध, Bharat Maza Desh Marathi Nibandh

    तर हा होता भारत माझा देश मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास भारत माझा देश हा मराठी माहिती निबंध लेख (Bharat maza desh Marathi nibandh) आवडला असेल.

  10. माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी Mazya Swapnatil Bharat Essay In Marathi

    आज आपण एका विषयावर बोलणार आहोत जे माझे स्वप्न आहे (Mazya Swapnatil Bharat Essay In Marathi) म्हणजेच माझ्या स्वप्नातील भारत. येथे आपण माझ्या स्वप्नांचा ...

  11. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  12. माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी

    माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी | Mazya Swapnatil Bharat essay in Marathi माझ्या स्वप्नातील भारत: मराठीत निबंध 🇮🇳 ️ आपले स्वप्न, आपलं भविष्य!

  13. अप्रतिम निबंध 2022भारत माझा देश |amazing Essay 2022bharat Maza Desh

    माझा भारत देश निबंध 2023 | Bharat Maza Desh Nibandh 2023. April 30, 2023 by Prashant. आजच्या लेखामध्ये आपण भारत माझा देश हा निबंध अभ्यासणार आहोत भारत माझा देश हा निबंध ...

  14. Detail Maza Bharat Desh Essay In Marathi In 2023

    Essay On Maza Desh In Marathi language. माझा भारत देश निबंध - सुजलाम सुफलाम हा माझा देश ,एके काली सोन्या ची खान , वीरांची व संतांची भूमी असा हा माझा देश . भरत ...

  15. माझा देश [भारत] मराठी निबंध

    Maza desh marathi nibandh : मित्रानो आपला देश भारताचा इतिहास खूप प्राचीन आहे.एकेकाळी भारत हा विश्वगुरू होता, आपल्या देशात प्राचीन काळात मोठमोठे साधू संत होऊन गेलेत.

  16. माझी भारत भूमी मराठी निबंध |Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language

    Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language: प्राचीन काळी तत्वज्ञान, अध्यात्म यांची भूमी म्हणून माझ्या भारत भूमीला ओळखले जायचे. आजही जगातून अनेक विद्वान

  17. माझा देश भारत मराठी निबंध

    माझा देश भारत मराठी निबंध | Maza Desh Bharat Essay In Marathi | माझा देश मराठी निबंध | Maza DeshYour Queries ...

  18. माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी

    माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी | Mazya Swapnatil Bharat Essay In Marathi मी एक भारतीय आहे. माझे माझ्या देशाबद्दल अतिशय सुंदर व मनोहर स्वप्न आहे.

  19. माझी भारतभूमी मराठी निबंध

    नमस्कार मित्रांनो आणि नवीन पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये "Mazi Bharat Bhumi Essay In Marathi" याविषयी माहिती देणार आहोत.

  20. Maza Bharat Desh

    Maza Bharat Desh | Essay in Marathi | माझा देश | माझा भारत देश | अप्रतिम मराठी निबंध |Please subscribe my channel for more ...

  21. Maza Maharashtra Nibandh Marathi Essay

    Maza Maharashtra Esaay Marathi WATCH VIDEO: या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत माझा महाराष्ट्र निबंध मराठी शेअर केला आहे.